भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट
नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड ,उत्तरप्रदेश , बिहार ,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आले होते . सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती .परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद, , अर्थमंत्री, डॉ. प्रकाश शरण महत, . ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री, शक्ती बहादूर बस्नेत,भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री,. प्रकाश ज्वाला, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री रमेश रिजाल, हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा भाग होते दोन्ही पंतप्रधानांनी पारंपारिक सौहार्द आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. त्यांच्या चर्चेदरम्यान, दो