पोस्ट्स

व्याख्यान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझे पहिले भाषणाची हकिकत भाग 2

इमेज
           वक्तृत्व ही एक कला आहे . याचा अनुभव मी नुकताच घेतला . त्या मागची पाश्वभुमी मी या आधीच सांगितली आहे . जर तूम्हाला त्याचे वाचन करायचे असल्यास लेखाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .       जो सतत वाचतो , तो कालांतराने खुप छान लिहुही शकतो, मात्र माझ्या मते हा न्याय  वक्तृत्वास लावता येणे अशक्यप्राय आहे .जो सतत अन्य वक्त्यांचे वक्तृत्व ऐकतो ,तो छान बोलूच शकेल असे नाही . मीही अनेक भाषणे ऐकतो , म्हणून मी छान बोलू शकतो , असे म्हणणे धाडसाचे ठरेल .किमान माझा पहिला अनुभव तरी हेच सांगत आहे .      वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे . शब्दांची गती, तयार भाषणात समोरच्या रसिकांचा मुड बघून यथायोग्य बदल करणे . ते बदल  आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात न येवू देणे .             उपस्थित मान्यवरांचा यथोचित उल्लेख करणे . प्रासंगिक विनोदाला , आधीच्या  वक्त्याच्या संदर्भ आपल्या आधीच तयार केलेल्या भाषणात जोड...

माझे पहिले भाषणाची हकीगत

इमेज
             आपल्याकडे ६४ कला आहेत असे म्हंटले जाते . वक्त्तृवकला ही त्यापैकीच एक . नुकताच मी त्या प्रांतात प्रवेशकर्ता झालो . अर्थात  हे घडले ते अपघातानेच मी काही या क्षेत्रात प्रवेश करायचे काही ठरवले नव्हते . तसे मी बरे लिहायचो ( म्हणजे अजूनही लिहितो बरका ) त्यामुळे काही लोकांसी ओळखीही झाल्या आहेत . अशीच एक ओळख झाली एका व्याख्यान आयोजनकर्त्याशी . माझे लेखन बघून त्यांना काय वाटले कोणास ठाऊक ? त्यांनी मला त्यांचा व्याख्यानांत मला श्रोत्यांना पिळायची परवानगी दिली आणि माझा वक्त्तृवकला या प्रांतात प्रवेश झाला          व्याख्यानमालेच्या आयोजकांशी एक दोनदा बोलणे झाल्यावर अखेर विषय ठरला . विषय माझ्या नेहमीच्या लिखानपेटीतील नव्हता असो , विषय छान होता . जुन्या हिंदी चित्रपटातील नायिकेच्या प्रेमप्रकरणावर हा विषय बेतलेला होता .                 बर पहिल्यांदाच व्याख्यान देणार होतो आणि आयोजकांनी तुम्हाला दीड  तास देणार आहोत , त्याचा पुरेपूर वापर  करा . वेळेचा आधी संपवून टाकून आम्हाला...

गुरुदत्त वहीदा रेहमान अणि गीता दत्त

                   आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका अत्यंत हून्नहरी सिने अभिनेत्याची ज्यांनी आपल्या 20 वर्षच्या सिने कारकर्दीत भल्याभल्यांना आपल्या प्रतिभेने भूरळ धातली . त्यांचे निधन झाल्यावर पन्नास वर्षे झाली तरी ही मोहीनी अद्याप कायम आहे   कोणतीही पारीवारीक पाश्वभूमी नसताना सर्वसामान्य   कोरोग्राफर ते सिनेनिर्माता दिग्दर्शक अशा त्याचा प्रवास थक्क्‍ करून सोडणारा आहे मी बोलणार आहे वसंतकुमार शिवशंकर पडूकोन अर्थात गूरूदत्त्‍ यांच्याविषयी मानवी आयूष्यातील दु:खे समस्या अडचणी सहजतेने रुपेरी पडद्यावर साकारणे आणि   त्यातून मनोरंजन करणे हा त्यांचा चित्रपटाचा मुख्या विषय होता .प्यासातून मानवी आयुष्यातील रक्तच्या नात्याती निरर्थकता गुरूदत्त्‍ यांनी प्रभावीपणे मांडलीये . भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे . असेच त्यांचाबददल म्हणावे लागेल.   १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पुर्ण झाली . .  मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने   घेतले जाते यातच त्यांचे   मोठेपण दिसून ...