पोस्ट्स

महाराष्ट्राशी सबंधित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

इमेज
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

इमेज
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

८० तासाला एक

इमेज
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये‌. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात  मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे. मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्...

प्रत्येक इतिहासप्रेमींनी संग्रही ठेवावे,असे पुस्तक, 'पेशवेकालीन महाराष्ट्र'

इमेज
आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनात इतिहास हा विषय आवडत नाही.कंटाळवाणा वाटतो.याचे महत्त्वाचे कारण तो म्हणजे राजकीय इतिहास असतो. इतिहासात वेळोवेळी राज्य केलेल्या व्यक्तींविषयी, त्यांनी केलेल्या युद्ध, लढाया आणि तह करार यांच्या विषयीची माहिती त्यात दिलेली असते. त्यांनी राज्य केले त्यांची माहिती जाणून आता काय उपयोग?या विचारातून इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही इतिहासाची एक बाजू झाली.त्या राज्यकर्त्यांनी ज्या समाजावर राज्य केले,त्या समाजाचा देखील एक इतिहास असतो. जसे एखाद्या प्रदेशातील राजकर्ते बदलतात, तसे हा इतिहास देखील बदलतो.त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे संपुर्ण  आकलन होण्यासाठी त्या प्रदेशाचा राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक इतिहास देखील आवश्यक ठरतो.,आणि तो जर आपलाच प्रदेश असेल तर विचारायलाच नको.आपले पुर्वज कोणत्या स्थितीत राहत होते.त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या पद्धतीने वेगळे रहात आहोत?हे समजले तर सोन्याहुन पिवळे.आपल्या प्रदेशातील सामाजिक इतिहास समजला तर आपल्याला आपण कोण आहोत,हे सहजतेने समजते आपलीच आपल्याला नवी ओळख होते.आपल्या महाराष्ट्राचा बाबत बोलायचे झाल्यास, आपली ही गरज स...

एका उत्तम व्यवस्थेवर विनाकारण उडालेले शिंतोडे

इमेज
            गेला आठवडाभर टीव्हीवर कोणत्या बातम्या दाखवल्या जात आहेत ? याचा आढावा घेतल्यास आपणास सर्वाधिक वेळ पूजा खेडकर यांच्याविषयीच्या बातम्यांनी व्यापलेला दिसतो . या बातम्या देताना काही माध्यमांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांनी काहीही चूक नसताना, त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला मध्ये खेचले सहजतेने लक्षात येते . मराठी वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेलवरील प्रतिक्रिया वाचल्यातर नंतर  सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास  बघावयास मिळतात . अमेरिकेत अशी कायम स्वरूपाची  नोकरीची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा नाही  मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षे होऊन देखील आपण ब्रिटिशकालीन प्रशासनव्यवस्था का अमलात आणत आहोत अशा त्रागा करणारा एक चर्चेचा कार्यक्रम एका सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीवर तितकाच किंबहुना कणभर जास्तच प्रसिद्ध असलेल्या वृत्तनिवेदकाने केलेला  मी बघितला केंद्रीय लोकसेवा अयोग्य सुद्धा भ्रष्ट झाला आहे सखोल चौकशी केल्यास हिच्यासारखे अजून ५६ अधिकारी सापडतील आय ए एस अधिकारी होणे आता फक्त पैसेवाल्या लोकांचेच काम आहे ज्या हात...

*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*

इमेज
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या, प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास  सेवेतून बडतर्फ करण्यासह,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे, खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच  दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते. आता त्यांना  क्षिक्षा होइल तेव्हा होईल, किंवा त्या निर्दोष ठरतील. आता यातील काय होते?, ते येणार काळच ठरवेल, त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल. असो.    मात्र पुजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. नवी दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि करोल बाग या परीसरात किंवा आपल्या पुण्याचा नवी पेठ,...

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

इमेज
         आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.           मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय सं...

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

इमेज
मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी, एसटीचा चाहता मात्र आहे. एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत, महाराष्ट्रातील नागपूर  या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे. माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे. या गृपवर सध्या  आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे  उपनगर असलेल्या दापोडीत  असणाऱ्या  वर्कशॉपमध्ये  BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत. एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे.    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर+सिटर ही बससेवा होती. (लाल आणि पांढरा पट्टा असणाऱ्या बसेस) पुर्णतः स्लीपर असी सेवा नव्हती.जी कमतरता आता पुर्ण झाली आहे. तसे बघायला गेलो तर राजस्थ...

पंतप्रधान मोदींना प्रदान होणार लोकमान्य टिळक पुरस्कार*

इमेज
    पंतप्रधान, नरेंद्र मोदी या नावाभोवती विलक्षण वलय आहे. अनेकांना त्यांच्याविषयी  उत्सुकता आहे, जी दिवसोंदिवस कमी होता वाढतच आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य जगाने अनुभवले आहे. त्या आधी गुजरात या भारतातील  क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर असलेल्या राज्याचा सर्वांगीण केलेला विकास देखील सर्वांनी बघीतला आहे. मात्र या खेरीज पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व मोठे आहे. सक्रीय राजकारणात येण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील मोठे आहे. या काळात त्यांनी काही काळ पुण्यात देखील कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर,  त्यांना देण्यात येणारा लोकमान्य पुरस्कार विशेष महत्तावाचा आहे. पुणे शहराची नाळ ओळखणाऱ्या, एका निस्पृह समाजसेवकाचा पुणे शहराने केलेला तो गौरव आहे.       पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकमान्य टिळक दोघेही प्रखर देशभक्त . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताची बाजू प्रखरपणे मांडताना आपण त्यांना वारंवार बघतोच.लोकमान्य टिळक यांनी अँनी बेझंट यांच्या सहकार्याने सुरु केलेल...

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल .मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .   एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत  ६०० लोकांना  प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे  लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी होते बहुसंख्य भारतीयच होते . २०२३  साली या दुर्घटनेला  ७६ ...

असी आहे आपली एसटी .....!

इमेज
   प्रातिनिधिक चित्र  मित्रांनो , आपल्या महाराष्ट्राची एसटी भारतातील एक प्रमुख सार्वजनिक सेवा आहे जी या एक जूनला 76 व्या वर्षात पदार्पण करत आहे आपल्या एसटी   महामंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या 12 प्रमुख प्रकारच्या बससेवा या आपल्या एसटीमार्फत पुरवल्या जातात . या 12  प्रमुख प्रकारातील एका प्रकारचे 5 उपप्रकार देखील पडतात .  आपली एसटी महामंडळ विविध प्रादेशिक विभाग आणि आगारमधून ही सेवा पुरवली जाते . चला तर एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून   जाणून घेवूया एसटी मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा . 1) परीवर्तन सेवा : एसटी महामंडळाची ही सर्वात स्वस्त आणि खेडोपाडी चालणारी सेवा आहे . या सेवेला लालपरी म्हणून देखील ओळखले जाते .  या सेवेचे विठाई , हरीत कुंभ ,  विद्यार्थी सेवा , एम एस बाँडी , साधी बस असे उपप्रकार पडतात . आता जाणून घेवूया याचे उपप्रकार ) विद्यार्थी   सेवा अ) हरीत कुंभ : नाशिकला कुंभमेळा असताना 2014-2015 ला एसटी महामंडळामार्फ...