भारत बदल राहा है
गेल्या काही वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक होत आहे तसेच भारताचे लष्करी सामर्थ्य देखील वाढत आहे १ डिसेंबर रोजी भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याचा अनुभव जगाने घेतला . एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरु असलेल्या युद्धाभ्यासाबाबतच्या मुद्यावरून चीनने घेतलेल्या आक्षेपावर प्रश्न विचारला असता त्यास परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या उत्तरावरून भारत हा आता पूर्वीचा राहिलेला नसून अरे रा कारे म्हणणारा सामर्थ्यवान भारत झाला आहे हे जगाला पुन्हा एकदा समजले या आधी सुद्धा परराष्ट्र संबधाबाबतच कठोर भूमिका घेतल्याने भारत बदलला आहे यावर शिक्कमोर्तबाच झाले आहे तर मित्रानो सध्या भारत आणि अमेरिका दरम्यान उत्तराखंड येथील औली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करी युद्धाभ्यास सुरु आहे हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील १८ वा युद्धाभ