धांडोळा आणीबाणीचा
२५ जून १९७५ भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची सुरवात होण्याचा दिवस . आज आपण त्यास आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखतो . जुन १९७५ ते मार्च १९७८ आणीबाणीचा कालखंड ओळखलं जातो . भारतातील तिसरी आणीबाणी होती ती आधी १९६२ साली आणि १९७१ साली आणीबाणी लादण्यात अली होती . मात्र आणीबाणी म्हंटली की आठवते ती हीच . जिने त्याकाळी मानवी आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली . अनेक नव्या राजकीय संकल्पना जन्म दिला . जसे द्विपक्षीय लोकशाही . वगैरे .
अमेरिका ग्रेट ब्रिटन च्या धर्तीवर द्विपक्षीय लोकशाहीचापाया घालण्याचा एक प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता , जो कालांतराने फसला . तो जर यशस्वी झाला असता तर भारतीय लोकशाहीची वाटचाल एका नव्या वळणावर झाली असती यात शंका नाही .
आणीबाणीचा समाजजीवनावर झालेला परिणाम म्हणजे त्या काळात संजय गांधी यांनी सुरु केलेली आणि प्रमाणात ज्यास अतिक्रेकी प्रमाण सुध्द्दा म्हणता येईल इतक्या प्रमाणात करण्यात आलेली नसबंदी . लोकसंख्या वाढीला त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला . काहीच दिवसापूर्वी भारताची लोकसंख्या येत्या काही वर्षात चीनला मागे टाकेल अशी होती. ती बातमी कित्येक वर्ष आधीच आली असती . आणीबाणी खरंच आवश्यक होती का ? की ती इंदिरा गांधी यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खेळली गेलेली खेळी होती यावर विविध मतमतांतरे असू शकतात . मात्र आणीबाणीमुळे लोकसंसंख्येला आळा बसला या बाबत कोणी शंका घेणार नाही .
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कार्यकाळात भारत लोकशाहीच्या एका नव्या वळणावर उभा आहे . जो आणीबाणी पासून कैक बाजूने वेगळा आहे . मात्र एक संपूर्ण पिढी त्यामुळे प्रभावित झाली हे नाकारून चालणार नाही . देशाच्या राजकारणाने एक वेगळे वळण त्यामुळे घेतले गेले . विरोधी पक्षांच्या नेत्यांना एका रात्रीत कारावासात धाडले गेले .माध्यमावर प्रचंड प्रमाणात बंधने लादली गेली . त्यामुळे आजच्या राजकारणात देखील पुरोगामी आणि भक्त यांचा राजकारणात याचा संदर्भ येत असतो . पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असले तरी . आज आणीबाणीला ४४ वर्ष म्हणजेच जवळपास अर्धे शतक होत आले आहे , तरी सुद्धा याचा संदर्भ येत आहे . यातच त्याची दाहकता जाणवते .
टिप्पण्या