धांडोळा आणीबाणीचा

         

२५ जून १९७५ भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची  सुरवात होण्याचा दिवस . आज आपण त्यास आणीबाणीचा कालखंड म्हणून ओळखतो .  जुन १९७५ ते मार्च १९७८  आणीबाणीचा  कालखंड  ओळखलं जातो . भारतातील तिसरी आणीबाणी होती ती आधी  १९६२ साली आणि १९७१ साली आणीबाणी लादण्यात अली होती . मात्र आणीबाणी म्हंटली की आठवते ती हीच . जिने त्याकाळी मानवी आयुष्यात प्रचंड उलथापालथ केली . अनेक नव्या राजकीय संकल्पना जन्म दिला . जसे द्विपक्षीय  लोकशाही . वगैरे .
        अमेरिका ग्रेट ब्रिटन च्या धर्तीवर द्विपक्षीय लोकशाहीचापाया घालण्याचा एक प्रयत्न  त्यावेळी करण्यात आला होता , जो कालांतराने फसला . तो जर यशस्वी झाला असता तर भारतीय लोकशाहीची वाटचाल एका नव्या वळणावर झाली असती यात शंका नाही .

            आणीबाणीचा समाजजीवनावर झालेला परिणाम म्हणजे त्या काळात संजय गांधी यांनी सुरु केलेली आणि  प्रमाणात ज्यास अतिक्रेकी प्रमाण सुध्द्दा म्हणता येईल इतक्या प्रमाणात करण्यात आलेली नसबंदी . लोकसंख्या वाढीला त्यामुळे काही प्रमाणात आळा बसला . काहीच दिवसापूर्वी भारताची लोकसंख्या येत्या काही वर्षात  चीनला मागे टाकेल अशी  होती.    ती बातमी कित्येक वर्ष आधीच आली असती . आणीबाणी खरंच आवश्यक होती का ? की ती इंदिरा गांधी यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खेळली गेलेली खेळी होती यावर विविध मतमतांतरे असू शकतात . मात्र आणीबाणीमुळे लोकसंसंख्येला आळा बसला या बाबत कोणी शंका घेणार नाही .
        आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कार्यकाळात भारत लोकशाहीच्या एका नव्या  वळणावर  उभा आहे . जो आणीबाणी पासून कैक बाजूने वेगळा आहे .  मात्र  एक संपूर्ण पिढी  त्यामुळे प्रभावित झाली हे नाकारून चालणार  नाही . देशाच्या राजकारणाने एक वेगळे वळण त्यामुळे घेतले गेले . विरोधी पक्षांच्या नेत्यांना एका रात्रीत कारावासात धाडले गेले .माध्यमावर प्रचंड प्रमाणात बंधने लादली गेली . त्यामुळे आजच्या राजकारणात देखील  पुरोगामी आणि भक्त  यांचा राजकारणात  याचा संदर्भ येत असतो . पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असले तरी . आज आणीबाणीला ४४ वर्ष म्हणजेच जवळपास अर्धे शतक होत आले आहे , तरी सुद्धा याचा संदर्भ येत आहे . यातच त्याची दाहकता जाणवते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?