दूरसंचार क्षेत्रातील अस्वस्थता
या तोट्याला जे कारण या कंपन्यांकडून देण्यात येत आहे ते AGR अर्थात AGGREGATE GROSS REVENUE चे . सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार दूरसंचार कंपन्यांना सरकारला द्याव्या लागणाऱ्या रक्कमेमुळे त्यांना हा तोटा आहे असे स्पष्टीकरण दूरसंचार कंपनींनी दिले आहे . दूरसंचार कंपन्यांच्या नफ्यामध्ये त्यांच्या ग्राहकांकडून मिळणाऱ्या रक्कमेबरोबरच
त्यांच्या सर्व मालमत्तांद्वारे मिळणाऱ्या पैसांचा समावेश करण्यात यावा हाच तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होय . त्याला AGR अर्थात AGGREGATE GROSS REVENUE म्हणतात . सन २००२ मध्ये हा मुदा प्रथम चर्चेत आला , यावर सहमती ना झाल्याने २००९ मध्ये या मुद्यावरून सर्वोच्च न्ययालयात खटला दाखल करण्यात आला . ज्याचा निकाल नुकताच लागला . त्यानंतर या दूरसंचार कंपन्यांना सरकारला द्याव्या लागणाऱ्या करापोटी त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली .
यामुळे सध्या आपण ज्या दरात बोलतो आणि इंटरनेटचा फायदा घेतो त्यामध्ये मोठी दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे . हे दूरसंचार कंपन्यांवरील संकट लवकरत लवकर दूर होवो , त्याची ग्राहकास कमीत कमी झळ लागो हि सदिच्छा व्यक्त करून आज पुरतो इथेच थांबतो , नमस्कार
टिप्पण्या