डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा
तिर्थस्वरुप
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना
साष्टांग नमस्कार
डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20 आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 9 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा ? काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्येची प्राथमिक चौकशीसरकारकडून पूर्ण झाल्याविषयी बातमी वाचली . तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर तुमच्या हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्ध पुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्यांना हेही
माहिती असेल की , प्राथमिक न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालय दाद मागता येते . उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते . सर्वोच न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रपतींकडे दया याचिका करता येते . आपल्या भारताच्या न्यायप्रणालीमध्ये याला किती वेळ लागेल याची काहीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही . त्यामुळे आपल्या खुन्याला शिक्षा कधी मिळणार ? हा मोठा प्रश्नच आहे . आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 51A या
कलमा नुसार नागरिकांनी
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे हे
त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे
. मात्र याचा नागरिकांना
विसर पडल्याने डॉक्टर
तुमचा मारेकरी अजून
गजाआड झालेला
नाही मागच्या वर्षी एका
अमिनेत्याचा मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी
केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) मदत
घेतली जाणार एका सिने
अभिनेत्याचा मृत्यूबाबत जी असल्याचे
जाहीर केले होते एका
अभिनेत्याचा मृत्यूबाबत जी
संवेदनशीलता सरकारकडून दाखवण्यात येते,
त्याचा एक शतांश
संवेदनशीलता देशातील राज्यघटनेत सांगितलेल्या
मुलभुत कर्तव्यासाठी आपले जिवन
वेचणाऱ्या आपल्याबाबत सरकारकडून दाखवण्यात
येवू नये . या
सारखे दुर्दैव नसावे
आमच्या नाशकात माञ तुमच्या नावे व्याखानमाला सुरु झालीये . इतरही शहरात सुरु झाल्या असतील तूमच्या नावे व्याखानमाला . याचा उपयोग किती होतो हे येणारा काळच ठरवेल . तुम्ही जो कायदा तयार केला तो
खुप चांगलाच आहे यात शंकाच नाही त्या कायद्यातर्गत काही शिक्षाही झाल्या . तुम्ही जिथे कुठे असाल तिथे हे बघून तुम्हाला आनंदच झाला असणार . आपल्या राज्यघटनेत 51 अ या कलमातंर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे नागरीकाचे मुलभुत कर्तव्य आहे माञ त्याचे पालनच केले जात नाही . परीणामी तुमच्या सारख्यांचा प्राण जातो हे दुर्दैवाचेच आहे ना ? त्या घटनेनंतर शनवार पेठेतील ओंकारेश्वर पुलावरुन मी कित्येकदा प्रवास केला आहे दरवेळेस मला तुमची आठवण आल्या शिवाय रहात नाही . अनेक
पोलिसी प्रकरणांची फाईल कालांतराने
कोणालाही काहीही शिक्षा न
होता बंद होतात.
दुर्देवाने आपल्या हत्येबाबबत
हेच घडताना दिसत
आहे . तुम्ही मांडत
असणारी भुमिका जरी योग्य
असली तरी जनमताचा
काहीसी विरोधी असल्याने याबाबत
जनमताचा रेटा उभा
रहाणे अशक्य आहे
. मात्र त्यामुळे आम्ही आपल्या
सारख्या एका
महान विचारवंताला, समाजाला
पुढे नेणाऱ्या समाजसुधारकाला
न्याय देण्यात कमी
पडलोय हे मात्र
नक्की .ब्रिटीश भारतात येण्यापुर्वी
जागतीक व्यापारात असणारा भारताचा
23टक्के असणारा वाटा ब्रिटीश
आल्यावर कमी झाला. याला
मी ब्रिटीश येण्यापेक्षा
आपले विज्ञानाकडील दुर्लक्ष
मानतो ब्रिटीश वैज्ञानिकदृष्टया प्रगत
असल्याने हे झाले
असे मला वाटते
. तरी पुढच्यास ठेच
मागचा शहाणा या
न्यायाने शहाणे का होत
नाहीये ? त्यासाठी तुमच्या सारख्या
अजून किती जणांना
प्राणांना मुकावे लागणार ? हा
मोठा प्रश्न आहे
काही मंडळी तुमच्यावर तुम्ही फक्त एका विशिष्ट समाजबाबतच बोलतात अन्य समाजबांधवांमध्ये असणाऱ्या अंधश्रद्धांविषयी तुम्ही चकार शब्द उभारत नाही अशा आरोप आपणावर करतात मात्र ते एक गोष्ट सोईस्कर विसरतात असे मला वाटते ते म्हणजे कोणत्याही सुधारणेस सुरवात ही एका कोपऱ्यातूनच होत जाते पहिले तो कोपरा सुधारतो मग टप्याटप्याने ती संपूर्ण गोष्ट सुधारत जाते सरतेशेवटी ती सगळी गोष्ट सुधारलेली असते समाजाला देखील ही गोष्ट लागू होते पहिले समाजातील एक घटक सुधारणार मग टप्याटप्याने
समाजातील सर्वच घटक सुधारतात . मात्र मीच का सुधारायचं सुधारण्याची सुरवात त्यांच्यापासून का नाही माझ्यापेक्षा त्यांना सुधारायची गरज जास्त आहे असे म्हटल्यास कोणाचीच सुधारणा होणे अशक्य आहे आपण समाज सुधारणेची चळवळ समाजातील एका घटकापासून सुरु केलेली असली तरी समाजातील अन्य घटकाच्या अंधश्रद्धांबाबत आपण दुजाभाव करत होता असे म्हणणे चुकीचे आहे दुर्दैवाने तुमची हि भूमिका आम्ही समाजसमोर आणू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा . तुम्ही ज्या एका समाजाबाबत अधिक आक्रमकपणे बोलतात त्यासमाजघटकांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण खूप जास्त आहे जर हा समाज सुधारला तर एकूण लोकसंख्येच्या पैकी मोठा भाग सुधारेल तसेही कोणत्याही देशात अल्पसंख्याक हे अधिक रुढीग्रस्त असतात त्यांच्यात जबरदस्तीने सुधारणा केल्यास त्यांच्यावरअत्याचार केल्याची भावना निर्माण होऊ शकते अल्पसंख्याक समाजात कारवायांच्या सुधारणा बहुसंख्याकांमध्ये केलेल्या सामाजिक सुधारणापेक्षा वेगळ्या मार्गाने कराव्या लागतात ही गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो त्याबाद्दल आम्हाला माफ करा#ही_माझी_एक_हजार_ पंचचाळिसावी _ब्लॉगपोस्ट_आहे
टिप्पण्या