वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !
1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 31 वर्षे अर्थात जवळपास दोन पिढ्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली. आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदा...

टिप्पण्या