मराठीची सक्ती
नुकताच महाराष्ट्र सरकारने सर्व बोर्डांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करणारा आदेश काढला .
तामिळनाडू मध्ये या प्रकारची सक्ती करणारा आदेश याआधी काढण्यात आला होता . मराठीची संवर्धन करण्यासाठी महत्त्वाकांशी पाऊल म्हणून याकडे सरकारी पक्ष बघत आहे . . हा प्रश्न न्यायालयात जाणार तिथे सरकार आपली बाजू कशी उचलून धरणार हे बघणे अतौक्याच ठरेल , त्यावरच सरकारच्या या निर्णयाकडे बघावे लागेल .
कविवर्य कुसुमाग्रजांनी डोक्यावर राजमुकूट असणाऱ्या मात्र अंगात फाटकी भरजरी शालू नेसून मंत्र्यालायात वाट बघणाऱ्या मराठीची कल्पना करून कैक वर्षे लोटली . या वर्षात पुलाखाहून बरच पाणी वाहून गेले आहे , त्या वर्षात मराठीची अवस्थ्या जाऊनच बिकट
झाली आहे . या बिकट अवस्थेत नवसंजीवनी देण्याचे कार्य यामुळे होईल असे सत्ताधिकाऱ्याना वाटत आहे . मात्र याचे पैठण येथे कैक वर्षापासून उभारण्यात येणाऱ्या संत साहित्य अभयास विद्यापीठासारखी अवस्था होयला नको. अन्यथा मराठीला वालीच राहणार नाही .
आपल्याच एका राज्य सरकारने इयत्ता अकरावी आणि बारावी साठी माहिती आणि तंत्रज्ञान य
विषयासाठी मराठी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याचा निर्यय घेतला होता , जो मराठीला मारकच ठरला असो . त्यानंतर मराठी भाषा विषयाच्या संदर्भात हा दुसरा निर्णय . दोन्ही निर्णय हे मूलगामी परिणाम करणारे .
माझ्या मते या निर्यायांचे यशापयश मोजायचे झाल्यास सरकार न्यायालयात हि बाजू किती उचलून धरते हे बघणे महत्वाचे ठरेल यावरचया निर्णयाचे यशापयश ठरेल . जर हा निर्यय न्यायालयात देखील टिकून राहिला तर आणि तरच या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसतील अन्यथा नाही .
टिप्पण्या