आपण कधी बघणार या प्रश्नांकडे
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना का दिसत नाही
नाही म्हणायला दिव्य मराठी सारख्या काही मराठी वृत्तपत्रात या विषयी बरेच काही छापून येते . मात्र ते वर्तमानपत्र पुण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मिळत नाही . या चित्रात बदल व्हावा अशे प्रयत्न वाढायला हवे . तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता म्हणून घेण्यास लायक ठरेल असे मला वाटते . .तो लवकरात लवकर व्हावा अशी मनोकामना करून आतापुरते थांबतो . ते पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यंत नमस्कार
.
टिप्पण्या