चेन्नइ , मराठवाडा , भविष्याची चाहुल देणारे ठिकाणे
आज हा मजकूर लिहित असताना, भारतातील आसाम, बिहार , आदी राज्यात पावसाने कहर केला आहे , मात्र याच भारतातील मराठवाडा हा विभाग आणि चेन्नई या शहरात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आलीये
आजमितीस मराठवाड्यात अत्यंत कमी पाणी आहे .तर चेन्नई शहरात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलीये . काही जण चेन्नई शहरातील पाण्याचा आणीबाणीला कर्नाटक बरोबर तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असणाऱ्या वादाला जवाबदार धरतील . मात्र हा वाद पाण्याचा अनुपलब्धतेमुळेच हा वाद सुरु झालायं, हे मात्र नाकारुन चालणार नाही . मराठवाड्यात त्याचा भौगोलिक स्थानामुळे अत्यंत कमी पाउस पडतो . त्यातही जो काही पाऊस पडतो तो जमीन जांभ्या खडकांची असल्याने पाणी फारसे जमिनीत मुरत नाही . परिणामि दर एक दोन वर्षानंतर मराठवाड्यावर पाण्यासाठी दाही
दिशा फिरण्याची वेळ येते . सध्याच्या बदलत्या हवामानाचा काळात पावसाचा लहरीपणा वाढल्याने यामध्ये भरच पडत आहे . आत्यंतिक राज्यनिष्ठा असलेल्या कर्नाटक आणि तामिळनाडूचा प्रशा काही औरच आहे . या मुद्यावर या दोन राज्यामध्ये कित्येकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत . मात्र कावेरी नदी वाटपाच्या प्रश्न काही सुटलेला नाही .
या कावेरी नदीच्या प्रश्नामध्ये तामिळनाडू कर्नाटक या दोन राज्याबरोबर केरळ आणि पौंडेचरी या भागांचा देखील समावेश असल्याने हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला आहे . मराठवाड्याच्या विकासाज्याची साठी सैविधानिक विशेष तरतुदी करून सुद्धा त्याची योग्य त्या प्रकारे अंलबजावणी न झाल्याने मराठवाड्याचे अनेक प्रशम अनुत्तरित राहिले आहेत . जे आपणास सध्या दिसत आहे .
हे चित्र निव्वळ सुरवात आहे . भविष्यात अशी नाईक चेन्नई आणि मराठवाडा निर्माण होऊ शकतात . आपल्याकडे आहे ना सध्या भरपूर मग वापरून टाका हि वृत्ती या साठी कारणीभूत ठरलीये . पुण्यासारख्या ज्या शहरांना३ते 4 धरणाव्दारे (फक्त पुणे शहराला {पिंपरी चिंचवड नाही }वरसगाव , पानशेत , खडकवासला या धरणातून पाणी पुरवठा होतो ) पाणीपुरवढा होता त्या शहरांमध्ये ही वृत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसते
. मात्र हे लोक अन्य ग्रामीण क्षेत्राचा विचार करत नाहीत . जे सर्वथा अयोग्य आहे . यामध्ये बदल होणे नितांत गरजेचे आहे . जरी पृथ्वीवर 71%पाणी असले तरी त्यातील जवळपास 97 % पाणी समुद्रात आहे . ज्याचा वापर करणे खर्चिक आणि सहजसोपे नाही . उरलेल्या तीन टक्यांपैकी जवळपास दीड टक्का पाणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर गोठलेल्या स्वरूपात आहे . ज्याचा वापर करणे पृथ्वीवरील हवामानाचा विचार करता धोक्याचे आहे . त्यामुळे उरलेल्या पाण्याचाच वापर आपणस करावा लागणार आहे . [
.या उरलेल्या पाण्यापैकी बरेचसे पाणी हिमालयात आहे , ज्यावर नियंत्रण असावे याच हेतूने चीनने तिबेटवर आणि पाकिस्तानने काश्मीरवर हक्क सांगितला आहे . पूर्वीचा इतिहास , धार्मिक एकता या सांगायच्या गोष्टी आहेत ] तो आपण कश्या प्रकारे करतो यावरच आपले पुढील भवित्यव्य अवलुबुन आहे नाहीतर सध्याच्या विज्ञानाला ज्ञात अशी विश्वातील एकमेव सजीव सृष्टी नष्ट होणे काही दूर नाही
टिप्पण्या