अवयवदान श्रेष्ठदान

   जवळपास सर्वधर्मीयांमध्ये दानाचे अनन्य साधारण महत्व सांगितले आहे . प्राचीन काळी जेव्हा ज्या गोष्टी त्यावेळच्या समाजाला ज्ञात होत्या . त्यातील सर्वाधिक समाजोपयोगी वस्तूंचे दान त्यावेळी करायला  सांगितले होते  . ज्यामध्ये धान्य , विविध वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा समावेश होता . समाज नेहमी प्रगतशील असतो , समाजाच्या जगण्याच्या पध्द्तीत कायम बदल होत असतो त्यानुसार दानाच्या गोष्टी देखील बदललेल्या आपणस दिसतात , . सध्याच्या विविध आरोग्याच्या समस्यासनी माणसे ग्रस्त असताना जर दान करायचे झाल्यास ते मानवी अवयांचे करणे अधिक संयुक्तिक आहे . मानवाने आज कितीही प्रगती केलेली असली तर हात पाय वगळता अन्य मानवी अवयव मानवास अद्याप तयार करता आलेले नाहीत . त्यामुळे  अवयवदानाचे   महत्व आयनोसाधारण आहे . हे महत्व समाजाला समजावे म्हणून संयुक्त राष्ट संघातर्फे १३ ऑगस्ट हा दिन आंतर राष्ट्रीय अवयदान म्हणून साजरा करण्यात येतो .
                आपण आपल्या शरीराचे मूत्रपिंड, फुफ्फुसेहृदयडोळे, स्वादुपिंडकॉर्निया,  छोटे आतडे,  त्वचेच्या ऊती,  हाडांच्या ऊती हार्ट वाल्व्ह, शिरा इत्यादी अवयव दान करू शकतो . एक अवयवदाता  त्याच्या चांगल्या  अवयवांचे दान करून आयुष्यात 8 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवू शकतो.एका अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख लोक त्यांचे महत्त्वाचे वाया निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडत असतात . आपल्या भारताच्या विचार केला असता ज्या शहराची लोकसंख्या हि ४ लाख असते त्या गावात महानगरपालिका स्थापन करण्यात येते . त्याचा विचार करता आपण समजू शकतो की जवळपास एका मोठ्या महानगर एव्हढी लोकसंख्या जर आपण जर अवयव दान केले तर वाचू शकते . तर तुम्ही करणार ना अवयव दान ?
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?