जरा याद करो उनको, जो लोटके घर ना आये
मुंबईवर 1993साली झालेल्या साखळी बाम्बस्फोटानंतर झालेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये ही घटना खूपच विध्वंस करणारी होती . या घटनेमध्ये अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली यांच्यासह अनेक पाकिस्तानी नागरिक असलेल्या दहशतवाद्यांच्या समावेश होता . त्यानंतर खटला चालवून या हल्यात जिवंत पकडलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फासावर चढवण्यात आले .
या हल्ल्यानंतर देशांतर्गत सरंक्षण सज्यता अधिक भक्कम करण्यात आली, ज्यामध्ये दहशतविरोधी
कायदा अधिक करणे . भारताची समुद्री संरक्षणाची फळी त्रिस्तरीय करणे मुंबईसाठी स्वतंत्रब्लॅक कमांडोंची निर्मिती करणे आदी अनेक पाऊले उचलण्यात आली त्याच बरोबरीने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडून त्याचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचे कामही यावेळी करण्यात आले . मात्र एवढे होऊन सुद्धा या हल्याचे मुख्य सूत्रधार पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहे . त्यांच्यावर कार्यवाही होऊन जेव्हा ते यश भूतलावरून निरोप घेतील तेव्हाच या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या जीवांना खऱ्या अर्थाने सद्गती लाभेल हि वेळ लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा व्यक्त करून सध्यापुरतो थांबतो .नमस्कार .
टिप्पण्या