वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता
कोड........ मिलॅलीन नामक
एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे
होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या
रंग या मध्ये
बदलतो . या खेरीज
माणसामध्ये कोणतेही बदल या
मध्ये होत नाही
. मात्र हे झाले
व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र
आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित
देशामध्ये त्या व्यक्तीचे
मनोविश्व या मध्ये
अक्षरशः ढवळून निघते . सध्या
सन 2020 मध्ये या मध्ये
काहीसा बदल झालेला
असला तरी सन
1960 च्या सुमारास हे प्रमाण
खूप मोठ्या प्रमाणात
होते . आणि
जर व्यक्ती जर महिला
असेल तर विचारयलाच
नको , लग्न
झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते
. कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता . सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी . कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे . याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .
सदर कादंबरीची सुरवात होते कोल्हापूर येथील एका पिढीजात काहीं गावांची इमानदारी असलेल्या देशपांडे या घराण्याच्या सुखी संसंसारापासून .. कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता . सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी . कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे . याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .
वृत्तीने बंडखोर असलेल्या आणि घराण्याचा पारंपरिक बडेजावपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणारा माधव हा या कांदबरीचा नायक . आणि त्यांची पत्नी म्हणजे सुधा जीला लग्नानंतर दोन वर्षाने कोडाची सुरवात होते . आणि आपल्या कांदबरीची सुरवात होते . पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या देशपांडे घराण्यात यामुळे प्रचंड वादळ उठते . परिणामी आपली वेगळी वाट चोखाळू इच्छिणारा माधव आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करतो . तो परत आपल्या पत्नीचा स्वीकार करतो का हे बघण्यासाठी महाश्वेता ही कादंबरी वाचावयासच हवी . मग वाचता ना ही कांदबरी ?
टिप्पण्या