वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता
कोड........ मिलॅलीन नामक
एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे
होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या
रंग या मध्ये
बदलतो . या खेरीज
माणसामध्ये कोणतेही बदल या
मध्ये होत नाही
. मात्र हे झाले
व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र
आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित
देशामध्ये त्या व्यक्तीचे
मनोविश्व या मध्ये
अक्षरशः ढवळून निघते . सध्या
सन 2020 मध्ये या मध्ये
काहीसा बदल झालेला
असला तरी सन
1960 च्या सुमारास हे प्रमाण
खूप मोठ्या प्रमाणात
होते . आणि
जर व्यक्ती जर महिला
असेल तर विचारयलाच
नको , लग्न
झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते
. कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता . सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी . कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे . याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .
सदर कादंबरीची सुरवात होते कोल्हापूर येथील एका पिढीजात काहीं गावांची इमानदारी असलेल्या देशपांडे या घराण्याच्या सुखी संसंसारापासून .
. कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता . सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी . कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे . याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .वृत्तीने बंडखोर असलेल्या आणि घराण्याचा पारंपरिक बडेजावपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणारा माधव हा या कांदबरीचा नायक . आणि त्यांची पत्नी म्हणजे सुधा जीला लग्नानंतर दोन वर्षाने कोडाची सुरवात होते . आणि आपल्या कांदबरीची सुरवात होते . पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या देशपांडे घराण्यात यामुळे प्रचंड वादळ उठते . परिणामी आपली वेगळी वाट चोखाळू इच्छिणारा माधव आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करतो . तो परत आपल्या पत्नीचा स्वीकार करतो का हे बघण्यासाठी महाश्वेता ही कादंबरी वाचावयासच हवी . मग वाचता ना ही कांदबरी ?


टिप्पण्या