भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे
भारतात मालवाहतूक आणि प्रवाशी वाहतूक यांना एकमेकांच्या अडथळा होऊ नये , रेल्वेच्या महसुलात सर्वाधिक वाटा असणारी मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी , रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे रस्तेमार्गे होणारी अवजड ट्रकांची कमी होऊन रस्ते अपघात कमी व्हावे , या उद्देश्याने उभारण्यात येणाऱ्या DFCसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंजिनच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय रेल्वेत एक मैलाचा दगड गाठला गेला आहे , असे म्हटल्यास वावगे ठरू नये .
एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या इंजिनात रेल्वे डायव्हरसाठी स्वच्छता गृहाची सोय करण्यात आलेली आहे , जी अन्य भारतीय रेल्वे इंजिनात नसते . या रेल्वे इंजिनामुळे सुमारे 7000 टनमाल 100किमी प्रति तास या वेगाने एका ठिकाणाहून नेता येणार आहे . 12000 अश्वशक्तीच्या या रेल्वे इंजिनात प्रत्येकी 6000 अश्वशाक्तीचे दोन इंजिने एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत . जी सोयीनुसार एकावेळी एक अथवा दोन्ही या प्रकारे वापरता येऊ शकतील. जरी एक इंजिन वापरले तरी दुसऱ्या इंजिनाच्या वजनामुळे टॉर्क वाढून फायदाच होणार आहे . आपल्या भारताच्या इतर रेल्वे इंजिनमध्ये चालकाला इंजिनच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास इंजिनाच्या बाहेर यावे लागते , या इंजिनात असे करावे लागणार नाही . रेल्वेच्या नियोजनानुसार हे इंजिन प्रामुख्याने प्रामुख्याने पूर्व बाजूच्या DFC साठी हे वापरण्यात येणार आहे . बिहार राज्यातील माधेपुरा येथे या इंजिनाच्या निर्मिती आणि देखभालीसाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे
हे इंजिन मुळात सन2017मध्ये भारतीय रेल्वेत दाखल होणार होते , मात्र त्याचा त्यावेच्या चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्याने त्याचा भारतीय रेल्वेतील प्रवेश बारगळला , जो आता होत आहे . "मात्र देरसे आये मगर दुरुस्त आये ". त्या हिंदी म्हणी प्रमाणे त्याच्या येण्यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलेल यात शंका नाही . जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेचा अश्व अशाच उधळावा अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो , नमस्कार
टिप्पण्या