मानवा आता तरी जागा हो !
मी अनेकदा चँनेल न्युज एशिया, एन एच के वर्ल्ड, सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील विज्ञान विषयक विभागामध्ये दोन नविन माहिती मिळाल्या .त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला असता, ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी . या बातमीच्या लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत दोन्ही बातम्या हवामान बदल या विषयाशी संबधित आहेत .
पहिल्या
बातमीनुसार गेल्या वर्षभरात ग्रीनलँडचा 552 गीगाटन इतका बर्फ वितळला आहे .
ज्यामुळे संपूर्ण युनिटेड किंगडम हा देश हा देश अडीच मीटर पाण्याखाली जाऊ शकतो
.सन 2012 आणि गेल्या
वर्षी ग्रीनलँड या बेटावर जेट स्ट्रीम या प्रवाहाचा अधिक दाबाचा प्रवाह आल्याने त्याचा परिणाम
स्वरूप ही बर्फ वेगाने वितळण्याची घटना घडली असे शास्त्रज्ञाचे मत आहे . मित्रानो
आल्प्स पर्वतावरून वाहणाऱ्या दोन जेट स्ट्रीम पैकी पश्चिम दिशेला जेट स्ट्रीममुळे
ही घटना घडली होती . पूर्व दिशेला जाणाऱ्या जेट स्ट्रीममुळे भारताच्या पावसावर परिणाम
होतो हेही आपण या वेळी लक्षात घेयला हवे
ग्रीनलँडवरील बर्फ वितळण्याचा प्रकारातील सध्या अनुभवयास आलेला हा लाक्षणिय बदल 1948 नंतर
पहिल्यांदाच अनुभवत आहोत .
संपूर्ण जगाचा विचार विचार करता महतवाची असणारी मुंबई , कराची , सिंगापूर तसेच ऑस्ट्रोलिया या खंडातील बहुतांशी शहरे ही समुद्रकिनारीच आहे . रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याचा जवळ समुद्रात आढळलेली भिंत ही समुद्राचे पाणी सातत्याने कोकणाचा घास घेत आहे . याचीच साक्ष देत आहेत . मात्र आपल्या भारतीय वृत्तवाहिन्या एका सिने अभिनेत्याचा मृत्यूबाबत जेव्हढा काथ्याकूट करतात , त्याचा एक शतांश देखील सरकारकडून, समाजसेवी संस्थेकडून व्यक्तींकडून पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय केले जाते . त्याचा कितपत उपयोग होतो , यावर भाष्य करत नाही .
मित्रानो आज
ग्रीनलँड या युरोपातील बेटातील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढलाय . उद्या
ही वेळ भारतावर देखील येऊ शकते हिमालयातील
बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्यास सध्या बिहार ,आसाम पश्चिम
बंगाल आधी प्रदेशात जे पूर आले आहेत , त्याचा कैक जास्त पटीने पूर येतील
त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होतील, हे वेगळे
सांगायला नकोच . सध्या मानवजात ज्या विषयांवर आपसात भांडत आहे , ते
विषय सोडून मानवजातीने पर्यावरण रक्षण या
विषयावर एकत्र येणे अत्यावश्यक आहे . कारण जर मुळात जर मानव जातच अस्तित्वात नसेल
तर भांडणार कोणाशी ? त्यामुळे म्हणावेसे वाटते मानवा आता तरी जागा हो !
बीबीसीच्या बातमीच्या लिंक
टिप्पण्या