वंदन बंडखोर कवियत्रीला


ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँक्टोबर हा आपल्या भारतातील दोन वेगवेगळ्या क्षेत्रात दिग्गज महिलांचा स्मृती दिन .असतो एक महिला म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आँपरेशन ब्लु स्टार, आँपरेशन मुक्तीवाहिनी असे अनेक धाडसी निर्णय घेतले, त्या इंदिरा गांधी होय, आणि दुसऱ्या म्हणजे कवीयत्री अमृता प्रीतम होय .31आँक्टोबर 2005रोजी त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली, एक वादळ शांत झाले आज दिनांक 31आँक्टोबर 2020 रोजी त्यांचा 15स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली. 

त्या हिंदी पंजाबी भाषेतील ज्ञानपीठ मिळवणाऱ्या पहिल्या कवीयत्री होत्या  हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गाण्याचे गीतकार असणाऱ्या शाहिर लूधीयानवी यांच्या बरोबरचे त्यांचे जीवन विशेष गाजले. मात्र त्यांची स्वतंत्र्य असी काव्यप्रतिभा होती . हे विसरुन चालणार नाही. नुकतेच जन्मशताद्बी वर्ष संपलेल्या अमृता प्रीतम यांचा जन्म 1919 आँगस्ट 31 रोजी सध्याचा पाकिस्तानातील महत्त्वाचे शहर असलेल्या गुजरानवाला येथे त्यांचा झाला. त्यांना साहित्य अकादमी , पद्मविभुषण या  आपल्या भारतातील पुरस्करांसह काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. 
\त्यांचा कवितेत अत्यंत नाजूक पद्धतीने भावना मांडणारी बंडखोर स्त्री लपल्याचे सहजतेने दिसून येते.त्यांचे शिक्षण लाहोर येथे झाले .फाळणीनंतर त्या दिल्ली येथे स्थाईक झाल्या .आज असणाऱ्या त्यांचा पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस वंदन करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?