भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकताना
मित्रानो , भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल या वेगाने कात टाकत असल्यानेच आपणास माहिती असेलच.खचितच असा एखादा आठवडा जातो , ज्यामध्ये भारतीय रेल्वेविषयी एकही बातमी चर्चस येत नाही . केंद्र सरकारच्या सर्वाधिक वेगाने घडामोडी ज्या मंत्रालयात घडतात ते मंत्रालय म्हणजे रेल्वे मंत्रालय , असे म्हटल्यास अतिशोयोक्ती होणार नाही . दर आठवड्यात किमान एकतर रेल्वे विषयक बातमी ही कानावर येतेच , गेल्याच आठवड्यात तीन घडामोडी घडल्या . मात्र पारंपरिक माध्यमातून या विषयी फारसे सांगण्यात न आल्याने त्या विषयी सांगण्यासाठो आजचे लेखन
तर मित्रानो प्रदूषण कमी व्हावे या हेतूने भारतीय रेल्वे आपल्या सर्व मार्गाचे वेगाने विद्युतीकरण करत आहे . हे आपणास माहिती आहेच . त्याच कार्यक्रमातर्गत चालवलेल्या उपक्रमामुळे रेल्वेचा पश्चिम मध रेल्वे हा विभाग पूर्णतः विद्यतीकरण झालेला पहिला विभाग झालेला आहे , तर उत्तर पश्चिम विभागात असणाऱ्या राजस्थानातील दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते अजमेर या दोन महत्त्वाच्या मार्गाचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण केले आहे . त्याचबरोबर पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे ज्यामुळे ऊत्तर भारतातून दक्षण भारतात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार हाये . ज्यामुळे सुमारे 180 किमी वाचतील .
या घडामोडी घडत असताना दुधात साखर म्हणावी अशी घडामोड डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर बाबत घडली . नव्यानेच मॅनेजिंग डायरेक्टर नियुक्त झालेल्यारवींद कुमार जैन या यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की , चालू आर्थिक वर्षाचा अखेर पर्यंत म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत सध्या ळक्म सुरु असणाऱ्या वेस्टन डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर आणि इस्टन डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर यांच्यातील 40% भाग मालवाहतुकीसाठी सुरु करण्यात आली आहे . ज्यामुळे कानपुर दिल्ली या भागातून गुजरातच्या बंदरावर सहजतेने जात येऊ शकते . पूर्वी ज्या प्रवाश्याला 40 तास लागायचे त्यासाठी आता फक्त 14 ते 16 तास लागतील
टिप्पण्या