वंदन धगधगत्या अग्निकुंडाला !


आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची  जर आपण यादी केली  तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या  गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला .स्वातंतंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते

 समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम  निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावेयाचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .

अंदमानातील त्या छळछावणीतून सुटल्यावर रत्नागिरीत (ज्या रत्नागिरीत ब्रिटीशांनी ब्रम्हदेशातील राज्याला तुरंगात ठेवले होते ) सावरकरांना स्थानबध्दतेत ठेवले होते त्या वेळेस त्यांनी मानवतेचे महान मंदिर असे ज्याला म्हणता येइल असे पतितपावन मंदिर उभारले थी त्यांचा समाजसुधारणेची सुरवात होती त्यानंतर त्यांनी समाजातील जाती प्रथेवर प्रचंड प्रमाणात आसूड ओढले माझ्या माहितीतील तरी डॉ बाबा साहेब आंबेडकरांनंतर स्वातंञ्यवीर सावरकर एकमेव क्रांतीकारक आहे ज्यांनी समाजसूधारणेला पण महत्व दिले लोकमान्य टिळकांचा समाजसुधारणेवरून गोपाळ गणेश आगरकरांशी झालेले मतभेद जग जाहीर आहेच महात्मा फुले यांनी समाज सुधारणेला प्रचंड पाठबळ दिले पण त्यांची राष्टीय सभेविषयक मते प्रतिकूल होती माञ सक्रीय राजकारणात राहून समाजसुधारणा करणारे स्वातंञ्यवीर म्हणूनच ईतरांपेक्षा उजवे ठरतात

          वरकरांनी आपल्या प्राचीन वारसा लाभलेल्या हिंदू धर्मातील कालसुसंगत नसणाऱ्या  चालीरीतींना  तिलांजली देत त्यास खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवले . त्यासाठी त्यांनी रत्नागिरीला सर्व जाती धर्माना प्रदेश असणारे पतित पावन मंदिरांची स्थापना केली , तसेच आपल्या धर्मांची प्रखर चिकित्सा करत त्यातील अनावश्यक परंपरांवर सडेतोड टीका करणारे लेखन केले . आपल्या दुर्दैवाने त्यांनी प्रस्तावित केलेल्या धार्मिक सुधारणांपैकी फारच कमी समाजमान्य पावल्या . जरी  त्यांच्या सर्वांच्या सर्व सुधारणा अमलात येणे अवघड असले तरी शक्य तेव्हढ्या जास्तीत जास्त सुधारणा जर समाज मान्य झाल्या असत्या तर आज समाजात दिसणारे चित्र खूपच आशादायक असते , यात माझ्या मनात तरी शंका नाही .


विज्ञानप्रेम हा सुध्दा त्याचातील मला विशेष भावलेला गुण आहेप्रखर धर्मप्रेमी असूनही धर्मातील अनिष्ट चालीरीतीवर हल्ला चालवणारे समाजाने आता विज्ञानाची कास धरली पाहिजे हे सागणारे सावरकर खरोखर महान व्यक्तीमत्व होते गाय उपयुक्त पशू आहे मानवाने तिचा जास्तीत जास्त वापर केला पाहीजे किंवा माझा निधनानंतर माझे कोणतेही क्रियाक्रम करू नये असे म्रुत्यूपञात सांगणारे सावरकर मला त्यामुळे अधिकच वंदनीय ठरतात सावरकर म्हणजे हिंदूत्व असा संकुचित अर्थ घेणाऱ्यांनी  सावकरांचा या विचाराचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे काही  वर्षापूर्वी नाशकात आंतरराष्टीय स्वातंञ्यवीर सावरकर संमेलन झाले त्यात आलेला माझा अनुभव मी या ठिकाणी सांगू इच्छितो  की या संमेलनात हिंदूत्व या विषयावर वक्त्यांचे विचार ऐकायला सभामंडपाचा दिडपट गर्दी होती म्हणजे सभामंडपाची जर तीनशे लोकांची क्षमता असेल तर साडेचारशे लोक आले होते माञ हिंदूत्व हा विषय संपल्यावर लगेच पाच मिनीटांनी विज्ञाननिष्ट सावरकर या विषयावर वक्ते आपले विचार मांडणार होते माञ त्यासाठी फक्त सत्तर ऐंशी लोक उपस्थित होते (आकड्याचा खरेपणावर बोलण्यापेक्षा मुद्दा समजून घ्यावा ही विनंती मि सभामंडपातील लोक मोजलेले नाहीत पण एक अंदाज येण्यासाठीचे काल्पनिक आकडे वापरलेले आहेत लोक किती प्रमाणात कमी झाले याचाअंदाज येण्यासाठी )

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हिंदुत्तवाची उभारणी केली त्याचा पाया विज्ञान हा होता .आपल्या भारतीय राज्यघटनेतसुद्धा 51A मध्ये सुद्धा नागरिकांनी आपली विचारसरणी विज्ञानाला पूरक करावी असे सांगितले आहे . मित्रानो विज्ञान या विषयांचे शिक्षण घेणे आणि विज्ञानाला पूरक विचारसरणी करणे या पूर्णतः भिन्न बाबी आहेत . विज्ञानाला पूरक विचारसरणी अंगीकारणे या मध्ये बुद्धीला प्रश्न पडण्याची सवय अंगी लावणे  , प्रत्येक गोष्टीवर अंध विश्वास ठेवता त्याची तर्कसुसंगत पध्द्तीने उभारणी करून बुद्धीला पटले तरच त्यांचा अवलंब करणे , या बाबी अंतर्भूत आहेत . या बाबी जर प्रत्येक भारतीयांनी आत,आत्मसात केल्या तर ती स्वातंत्रवीर सावरकरांना खऱ्या रथाने आदरांजली ठरेल असे मला वाटते

सावरकारांचे आज देखील विचार करायला लावणारे कार्य म्हणजे त्यांनी मराठी भाषेविषयी केलेले कार्य आज मराठी भाषा अत्यंत कठीण कालखंडातून चालली आहे . कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी विधानमंडळासमोर उभी असणाऱ्या  मराठीची कल्पना करून आज कैक वर्षे उलटली आहेत . मराठीची अवस्था तेव्हापासून आगीतून फुफुट्यात जाणारी आहे असे मला वाटते . स्वातंञ्यवीर सावरकर आणी छञपती शिवाजी महाराज यांनी परभाषेतून मराठीत रुढ झालेल्या अनेक शब्दांना मराठीत अनेक प्रतीशब्द दिले जसे एडीटरला संपादक वगैरे .त्यांनी दिलेले सर्वच शब्द मराठीत रूजले असे नाही काही संस्कृत्तोभव शब्दांऐवजी इंग्रजी शब्दच रूळले . या विषयी मी एकदा एका व्यक्तीशी बोललो असता त्यांनी लोखंड ज्या प्रकारे वापरल्यास गंजते त्या प्रकारे ते शब्द वापरल्याने त्यांचे इंग्रजी शब्दच रुढ झाले असे म्हटले .जर ते शब्द वापरले असते तर ते नक्कीच रूढ झाले असते असे त्या सद्दगृहस्थाचे मत होते . असो

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एका ब्लॉग पोस्टच्या विषय नाहीच . मात्र ज्याची सुरवात असते त्यास शेवट हा करावा लागतोच .त्याच न्यायाने मी आपली रजा घेतो . जय स्वातंत्र्यवीर सावरकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?