वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !
20 ऑगस्ट 1944 हि निव्वळ तारीख नाहीये . ही तारीख आहे आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या देशाला कित्येक वर्ष पुढे घेऊन जाणाऱ्या एका कणखर पंतप्रधानाची. राजीव गांधी हे त्या पंतप्रधानाचे नाव . आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस मी असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडणे यात काही वावगे असे काही नाही . जगभरात असेच झाले आहे . भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या आफ्रिकी आणि आशियाई देशांच्या लोकशाहीची वाटचाल आपल्या भारताच्या लोकशाही सारखीच झाली आहे . असो
राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड असलेल्या धाकट्या भावाचे अपघाती निधन झाल्यामुळे, एक कुटुंबवच्छल, घराण्याची परंपरा चालवण्यासाठी राजकारणात उतरलेला राजकारणी. ज्यांनी
काळाची पाउले ओळखून भारतात तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवली. आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा, आयटीच्या युगात राहातो, त्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी जनमताचा विरोध पत्कारुन केली.त्यांचे काही निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरले. ज्यामध्ये शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करावाच लागेल. भोपाळच्या मुस्लिम बांधव परीवारातील शहाबानो या घटोस्फोटीत महिलेला पोटगी देण्याबाबात सर्वोच्च न्यायालय सुरु असलेल्या खटल्याचा निर्णयासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ते वादग्रस्त ठरले. स्विडनची शस्त्रात्र निर्मिती कंपनी असणाऱ्या बोफोर्स या कंपनीस तोफेसाठी लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. जो सिद्ध होवू शकला नाही. मात्र त्यामध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले .
टिप्पण्या