28 वर्षापूर्वीची ती काळरात्र
.
दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी केली .या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 28 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच. लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे
मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 28वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील धारवाड या परीसरात भुगर्भात असणाऱ्या फटीमुळे (जी धारवाड फाँल्ट म्हणून ओळखली
जाते) हा भुकंप झाला, त्यावेळी या परीसरात असणाऱ्या दगडाच्या घरे बांधण्याचा सदोष पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली, .या ठिकाणी त्यावेळी दगडांचा मोठ्याला चिरा एकमेकांवर रचून घरांच्या भिंती रचल्या जात भुकंपामुळे जेव्हा घरे कोसळली तेव्हा या दगडाच्या चिरा माणसांवर पडल्या ज्यामुळे अनेक लोक जखमी झाली तसेच लोक झोपले असताना मध्यरात्री भुकंप झाल्याने यामध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली
टिप्पण्या