समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

     

   पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .
             सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत
                  जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .21मार्चनंतर सूर्य कर्कवृताकडे भ्रमण करतो सूर्य कार्कवृतावर २२जूनला असतो त्यानंतर तो दक्षिणेकडे प्रवास करायला सुरवात करतो आणि दक्षिणायन सुरु होते जे २२ दिसेबर पर्यंत सुरु राहते (यामध्ये 21 सप्टेंबर ला सुर्य परत विषववृतावर असतो ) 22डिसेंबरला सुर्य मकरवृतावर असतो . त्यानंतर तो परत भासमान पध्दतीने कर्कवृतावर सरकतो त्यांनतर उत्तरायण सुरु होते . आपल्या भारतीय समजतीनूसार मकरसंक्रातीला उत्तरायण सुरु होते . पण प्रत्यक्षात तो सूर्याचा मकरराशीतील प्रवेशअसतो . काही हजार वर्षापूर्वी सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि उत्तरायण एकाच दिवसी होत असे मात्र पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा फरक पडला आहे. (ज्योतिषशास्ञा नुसार पंचांगाचे सायन आणि निरयन पंचाग असे जे दोन प्रकार पडलेत ते या मुळेच हा उत्तरायण सुरु होण्याचा फरक फरक मानायचा की नाही ) आता सुर्याचा मकर राशीतील प्रवेश 15 जानेवारीला होतो आणि दर 70वर्षानी हा दिवस एक दिवस पुढे पुढे जात आहे . सुर्याचा या भासमान प्रवासात तो दोन ठिकाणी विषवृताला छेदतो त्या संपाद बिंदू पैकी एका बिंदू पाशी एके काळी आपले राशीचक्र सुरु होत असे . आता होत नाही . कारण पृथ्वीची परांचन गती .जिच्यात आता बदल होत आहे .
      पृथ्वीवरील ऋतुचक्राच्या निर्मितीत या उत्तरायण आणि दक्षिणायनाचे महत्व अन्ययसाधारण आहे . किंबहूना त्यामुळेच पृथ्वीवर विविध ऋतू चक्र निर्माण झाले असे म्हटल्यास वावगे ठरु नये .भौगोलिकदृष्ट्या विचार करता या नंतरऊत्तर गोलार्धातील दिवस लहान होत जातो  तर दक्षिण गोलार्धातील दिवस मोठा होतो दक्षिण गोलार्धात ही उन्हाळ्यची सुरवात असते तर उत्तर गोलार्धात ही हिवाळ्याची सुरवात असते भारतीय पौराणिक मान्यतेनुसार या काळात असुरांचे राज्य असते मात्र हा दिवस भौगोलिक दृष्ट्या खूप महत्तवाचा आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही आपल्याकडे अनेक दिवस साजरे करण्यात येतात मग साजरे करणार हा दिवस मग साजरे करणार कि नाही  दिवस 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?