राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने


वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात.  त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी ९ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवस हा १ नोव्हेंबर असतो . , तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश छत्तीसगढ, मध्यप्रदेश ,राजस्थान, पंजाब आणि हरीयाणा  ही ती 9 राज्ये तर पड्डुचेरी (जूने नाव पाँडेचरी),अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिल्ली तसेच चंडीगढ या केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो.          आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो. आपले संविधान संघराज्य पद्धतीचे मात्र केंद्रीय सत्ता कहीसी प्रबळ करणारे आहे. अमेरीका या देशात विविध राज्यांनी स्व हितासाठी एकत्र येत संघराज्य स्थापन केले आणि अमेरीका हा देश तयार झाला. आपल्या भारतात तसे झाले नाही. पहिले देश तयार झाला मग त्याचे विविध राज्यात विभाजन करण्यात आले. आजमितीस भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

 ब्रिटीश भारतात असणाऱ्या विध्य प्रदेश राज्य सध्याचा मध्यप्रदेशात समाविष्ठ करण्यात आले. त्याखेरीज इतर कोणत्याही राज्याचा समावेश दुसऱ्या राज्यात करण्यात आला आहे. नाही म्हणायला पंजाब राज्यातील काही संस्थानिकांचा समावेश असणारे पेप्सु, आणि राजस्थान मधील संस्थानिकांची राजपुताना  नावाची प्रशासन व्यवस्था

स्वतंत्र्य भारतात अल्पकाळ होती.  संस्थाने भारतात विलीन करताना एक पायरी म्हणून होती. तसेच ती ब्रिटीश भारतात स्वतंत्र्य राज्य नसल्याने ती सोडून देवूया . विध्य प्रदेशच्या अपवाद वगळता भारतात कोणतेही राज्य दुसऱ्या राज्यात विलिन करण्यात आले नाहीये.

प्रशासन करणे सोइचे व्हावे, यासाठी भारतात पंडीत नेहरु डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असून, देखील भाषावार प्रांतरचना करण्यात आली. एक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचे एक राज्य या निकष यासाठी अमंलात आणला गेला होता. पंडीत नेहरु डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भाषावर प्रांतरचना केल्यास प्रांतिक अस्मिता मोठ्या होतील, ज्यामुळे देशाच्या एकात्मतेला खीळ बसेल. सध्याची स्थिती त्यांची भिती काहीसी खरी ठरवणारी आहे, असे दिसत आहे, असो. 

भारतात आजमितीस 28 राज्ये असली तरी नवीन राज्य निर्मितीच्या मागण्या मोठ्या संख्येने आहेत.अमेरीकेत 50 राज्ये आहेत.तर भारतात का नको? असा मुद्दा यासाठी मांडण्यात येतो. अमेरीकेची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, भारताचे क्षेत्रफळ, अमेरीकेचे क्षेत्रफळ लोकसंख्येची घनता या घटकांचा विचार या मुद्दयांवर भांडताना करायला हवा याचा मात्र सोइस्कर विसर नव्या राज्यांची मागणी करताना होतो.

आज भारतात , कर्नाटक मधून हैद्राबाद कर्नाटक, बाँम्बे कर्नाटक या  प्रादेशिक भागांचे एकत्र स्वतंत्र राज्य,  महाराष्ट्रातून विदर्भ , बिहार मधून मिथांचल, पश्चिम बंगाल दार्जलिंग, आसाम राज्यातून ब्रम्हपुत्रा, तसेच महाराष्ट्र ,गुजरात, मध्यप्रदेश यांच्या सिमा जिथे एकत्र येतात त्या आदिवासी भागासाठी स्वतंत्र भिल्ल प्रदेश तामिळनाडू मधुन स्वतंत्र उत्तर तामिळनाडू आदी अनेक राज्यांचा मागण्या आहेत.त्या पुर्ण करणे अथवा न करणे पुर्णपणे संसदेच्या हातात आहे. सध्या स्वतंत्र छोट्या राज्यामुळे प्रदेशाचा विकास होतो असी विचारधारा असणाऱ्या भाजपाची सत्ता आहे.मात्र कोणीही सरकारी यंत्रणेतील व्यक्ती त्यावर मतप्रदर्शन करत नाहीये.त्यामूळे हा मुद्दा बासनातच बांधल्या गेल्याचे दिसत आहे. असो भारतात राज्य निर्मितीचे नेहमीच राजकारण केले जाते. त्याचेच प्रत्यंतर सध्या दिसत आहे. अस्मिता जागवल्या जातात  जे सर्वथा अयोग्य आहे. भारत जगातील उभरती महासत्ता आहे. तीला या राजकारणाने खीळ बसू नये, असी सदिच्छा व्यक्त करुन आपली रजा घेतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?