बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)
बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ? हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो .
यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा
काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याचीच हाच निश्चय त्याच्या देहबोलीतून जाणवतो . ऑलम्पिकमध्ये सुवर्णपद मिळवणारे आणि बुद्धिबळातील जगजेता यांची मानसिकता एकच असते . अविरत मेहनत नावीन्याच ध्यास , नवनवीन खेळी शोधून त्यावर अभ्यास करावा लागतो , प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करणे, त्याचे कच्चे दुवे ओळखणे, त्याचा फायदा घेत त्यावर मात करणे . खेळताना पराभवाची निर्माण ना होऊ देणे या गोष्टींची जाणीव बुद्धिबळपटूस खेळताना ठेवावी लागते,खेळात यश म्हणजे जिकणे हे समीकरण आपण बनवले आहे . जिंकणे आणि यश मिळवणे या दोन्ही गोष्टी ठरवलेल्या उद्दिष्टांशी, लक्ष्यांशी निगडित असतात.,असे मानसशास्त्रज्ञ डॉ . क्रटी यांचे म्हणणे आहे . या गोष्टीशी खेळाडू परिचित असेल तर खेळाडू यशस्वी होण्याची शक्यता वाढते जर परिचित नसेल तर खेळाडूला त्रास होतो . बुद्धिबळ का खेळले जाते याचे कारण एकच आहे स्वतःची बौद्धिकता सिद्ध करण्यासाठी .यामुळे या खेळातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला सिधद करण्यासाठी धडपडत असते . खेळाडूची यशस्विता त्यांचा ध्येयाशीच निगडित असते . हे मनसशास्त्राने दाखवून दिले आहे
लेखक
टिप्पण्या