सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त


बाँलिवूडचा
खरा सम्राट गुरुदत्त"मरावेपरी किर्तीरुपे उरावे"अशी आपल्याकडे एक मराठी  म्हण आहेमनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव  आदरानेघ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा  अर्थआहे . भारतातील सिनेसृष्टीचा  विचारकरता  कृष्णधवलसिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिनेअभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिनेनिर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच लागेल जुलै हि त्याची जयंती त्या निमित्याने त्यांच्या स्मृतीस अभिवादन  
  गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्यम्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांनासहजतेने चित्रित करणे , प्यासामध्ये मानवी आयुष्यातलीनात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवीनाते  कसे  थिटेपडतात  याचेसुंदर चित्रण यातूनघडते . कागज के  फूलया चित्रपटातून सिनेसृष्टीचे भीषण वास्तवत्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनीआपल्या चित्रपटात अनेक नव्यातंत्राचा वापर सुद्धाकेला कृष्णधवल छायाचित्रणाचाकाळात अंधार आणिउजेड यांची सांगडघालून उत्कृष्ट छायाचित्रणकसे करायचेजे अत्यंतपरीणामकारक ठरेल.तसेचपडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजपचेहऱ्याचा वापर वापरछायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेचकँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावेलागते ते म्हणजेगुरुदत्त प्यासामध्ये चित्रीकरणातून एखादी प्रतिमा कसी टिपायचीयाचे खुपच बारकावेटिपलेले दिसतात. "जाने वो.कैसे लोगथे जिनको प्यारको प्यार मिला"या गाण्यातून किंवाये दुनिया भीअगर मिल भी जाये तो क्याहै?"या गाण्यातून आपणास हे वारंवारदिसून येते. आपलेच जीवन तर चित्रपटातदाखवले नाही ना,असे वाटावे इतकेसत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले.चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाचा समाजावरील परीणाम त्यांना पुर्णपणे माहिती असल्याचे त्यांचे चित्रपट बघताना वारंवार जाणवते. गुरुदत्त हे काळाच्या पुढे बघणारेसिने दिग्दर्शक , सिनेनिर्माते होते. त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांचे  कथानक आपणास खिळवून ठेवते पटकथेवर.त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे त्यांचे चित्रपट बघताना समजते.आपणास हवे असणारे दृश्य चित्रीत करण्यासाठी प्रकाश योजना कस्या प्रकारेहवी आहे. याचा फारच बारकाईने अभ्यासकेल्याचे त्यांचा चित्रपटातून दिसते.कागज के फूलया चित्रपटातून तेस्पष्टपणे जाणवते सुद्धा .                   
जागतिक कीर्तीच्या टाइम्समॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तमअश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता,तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्तयांची निर्मिती आणिप्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्या20 वर्षाचा कालावधीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले.गुरुदत्त यांची सिने कारकीर्दजर अजून बहरलीअसती तर भारताच्या झोळीत ऑस्करचे किमान2 ते  3 पदकेनक्की आले असते. या बाबत कुणालाच शंका असायला नकोवास्तवातील रियल लाईफला रील लाईफच्या रुपेरी पडद्यावर सहजतेने साकारणे यात त्यांचा हात मधुर भांडारकरयांच्या खेरीज कोणी अन्य धरू शकणार नाही, याबाबाबत कोणाचंच मनात किंचितशी देखील शंका नसावी. मधुर भांडारकर यांनी ज्याप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता रुपेरी पडद्यावर आणली . त्याचप्रमाणे मधुर भांडारकरयांच्या कित्येक वर्ष आधी त्यांनी हा प्रयोगकेला होता
बॉलिवूडचे वास्तव त्यांनी"कागज के फुलया सिनेमातून जगासमोरआणले , तर पैशापुढे मानवी नटे कशे थिटे पडतात, याचेचित्रण त्यांचा प्यासा याचित्रपटातून समोर येते. तर नात्यासंदर्भातील क्षणभुंगुरता त्यांचा " साहब बीबीऔर गुलाम " याचित्रपटातून आपल्याला दिसते . कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचेजे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त    सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसतो तो त्यांची अंधार आणि प्रकाशाची जाण किती उत्तम होती याची साक्ष देते.कागज के फुल या चित्रपटात देखील कँमेरामधून खोली कसी पकडता येते,त्यांचा कँमेरा क्लोजअपचा विचार करायचा झाल्यास प्यासाचा विचार करावाच लागेलप्यासामध्ये आपणास क्लोज अपच्या बऱ्यापैकी वापर केलेला आढळतो.प्यासामध्ये चित्रीकरणातून एखादी प्रतिमा कसी टिपायची याचे खुपच बारकावे टिपलेले दिसतात. "जाने वो.कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिलाया गाण्यातून किंवा ये दुनिया भी अगर मिल भी जाये तो क्या है?"या गाण्यातून आपणास हे वारंवार दिसून येते.त्यांचा कँमेरा क्लोजअपचा विचार करायचा झाल्यास प्यासाचा विचार करावाच लागेलप्यासामध्ये आपणास क्लोज अपच्या बऱ्यापैकी वापर केलेला आढळतो.प्यासामध्ये चित्रीकरणातून एखादी प्रतिमा कसी टिपायची याचे खुपच बारकावे टिपलेले दिसतात. "जाने वो.कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिलाया गाण्यातून किंवा ये दुनिया भी अगर मिल भी जाये तो क्या है?"या गाण्यातून आपणास हे वारंवादिसून येते.मानवी दुःखाना नाट्यमय कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर साकरणे, आणि त्यातून मनोरंजन करणे यामध्ये त्यांचा हात त्यांचा समकालीन दुसरा कोणीच धरु शकणार नाही. गुरुदत्त यांचे सर्व सिनेमे मुख्य धारेतील होते. आर्ट फिल्म प्रकारातील नव्हते, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या काहीसे मागे पडलेल्या मधूर भांडरकर यांची याबाबत काही प्रमाणात तूलना होवू शकते. कारण मधूर भांडरकर यांचे चित्रपट वास्तवदर्शी असले तरी  फारसे हृदयद्रावक नाहीत.    
प्रेमभंग, अव्हेलना, इतरांच्या यशाचे वाटेकरी होण्याची मनुष्याची मनीषा, अपयशी व्यक्तींकडे बघण्याची
मनोवृत्ती, घरातील सत्तासंघर्ष  आणि त्यामुळे होणारी मनाची घालमेल, समाजातील नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या व्यवसायातील लोकांची प्रेमळ मानसिकता आदी मानवी भावभावनांचे गुरूदत्त यांच्या चित्रपटात वास्तवदर्शी चित्रण आपणास पहावयास मिळते. गुरुदत्त यांचे मिस्टर अँड मिसेस 1955 सारखे एक दोन चित्रपट वगळता बहुतेक सर्व चित्रपट मानवी आयुष्यातील काळी बाजू नायकप्रधान असणाऱ्या कथानकांवर आधारित होते.                          
 अनेक प्रतिभावानं  मिळतेतसे अल्पायुष्य त्यांनामिळाले . उणापुऱ्या 39 वर्षाच्या आपल्या आयुष्यातत्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतहिमलयाएव्हढे कार्य केले . त्यांनीतेलगू भाषिक अभिनेत्रीवहिदा रेहमान यांनाहिंदी चित्रपट सृष्टीतपदार्परणाची संधी दिली. एकेकाळी बेस्ट मध्ये कन्डक्टरअसणाऱ्या जॉनी वॊकरयांना आपल्या अनेकचित्रपटात संधी देऊन त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतीलप्रवेश सुकर केला.                      
   प्रेमाच्या कात्रीत अडकून त्यांचे10 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत काहीश्या एकाकी अवस्थेत त्यांचे अकस्मित असे निधन झाले . निधनाप्रसंगी त्यांच्या प्लेटमध्ये फक्त त्यांचा एक विश्वासू नोकर सोबतीला होता. त्यांची पत्नीमुले,अथवा प्रेयसी त्यांच्याबरोबर नव्हती . त्यांचे निधन  ही त्यांनी जाणूनबुजून केलेली आत्महत्या होती , की प्रचंड नैराश्य आल्याने घेतलेले मद्यआणि अनावधानाने घेतलेल्या झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्याचे निधन झाले या बाबत निश्चित असे काहीही सांगता णे अवघड आहे. त्यांचे 9 ऑक्टोबर 1964  रोजीरात्री फोनवर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांच्याबरोबर प्रचंड वाद झाला होता . त्या वादाच्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीस जर तूआपल्या मुलांना मला भेटायला घेऊन आली नाहीस तर माझे मृतशरीर बघशील असेसां गितले होते . मात्र तरीदेखील त्यांची पत्नी गीता दत्त यांनीआपल्या मुलांना  गुरुदत्तांकडेघेऊन जाण्यास नकारदिला . आणि 10 ऑक्टोबर 1964  रोजी त्यांचेशरीर त्यांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत सापडले आणि भारतीय एका मनस्वी , हळव्या कलाप्रधान सिने अभिनेता, सिने दिग्दर्शक, सिने निर्माता, सिने दिग्दर्शक असणाऱ्या गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर याना कायमचे मुकला  त्यांचा निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीची झालेली हानी भरून निघणे अशक्यच आहे. मात्र त्यांच्यावर जशी वेळ आली तशी अन्य कोणावरही ना येवोअशी अशा व्यक्तकरून सध्यापुरते थांबतो, नमस्कार


 #हि_माझी_एक_हजार_सोळावी _ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?