भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षणीय कामगिरी
सध्या भारतीय क्रीडाविश्व त्यातही बुद्धीबळविश्व अत्यंत दैदिप्तमान कामगिरी करत आहे . बुद्धिबळ ऑलम्पियाडचे अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी आयोजन करण्याचे शिवधनुष्य भारतीय क्रीडा खाते आणि तामिळनाडू सरकारने लीलया पेलल्यानंतर भारतीय बुद्धिबळ विश्वाचा घोडा अधिकच मोठ्या वेगाने धावायला लागला आहे . ७ ऑगस्ट रोजी भारताला ७५ वा ग्रँडमास्टर मिळाल्याचा आनंद बुद्धिबळप्रेमींना आनंद मिळाला असताना तो आंनद द्विगुणित करणारी घडामोड भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बाबत घडली . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president) म्हणून विश्वनाथन आंनद यांची निवड झाल्याची हि दुसरी आंनदवार्ता होती कोणत्याही बुद्धिबपटूस असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे पाचवेळा विश्वविजेता झालेले विश्वनाथन आनंद खऱ्या अर्थाने या पदासाठी सुयोग्य व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया बुध्दिबलविश्वातून उमटत आहे
गेल्या काही वर्षाचा आढावा घेतल्यास भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे . भारतीय मूळ असून देखील १९८७ पर्यंत भारतात एकही बुद्धिबळ ग्रँडमास्टर नव्हता .१९८६ साली विश्वनाथन आनंद हे पहिले ग्रँडमास्टर झाले त्यानंतर २००० पर्यंत बुद्धिबळाचा विकास वेगाने झाला अनेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाले २००० नंतर हा विकास अतिशय वेगाने झाला २०१० नंतर तर हा वेग प्रकाशाला लाजवेल असा होता या काळात भारतात अनेक ग्रँडमास्टर भारतात उदयास आले भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्पर्धेत अत्यंत नेत्रपदिक कामगिरी केली जी अजूनही ऑगस्ट २०२२ मध्ये सुद्धा सुरु आहे दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत भारताने सुवर्णपदक मिळवले होते नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये डी गुकेश या भारतीय बुद्धिबळपटूने अत्यंत चमकदार कामगिरी करत ११ डावांपैकी ९ डाव अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे . याखेरीज बुद्धिबळातील विबल्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत ( पूर्वी ही स्पर्धा कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धा म्हणून ओळखली जायची मात्र कोरस स्टील हि युरोप खंडातील अत्यंत महत्त्वाची स्टील कंपनी टाटांकडे आल्यावर कोर्स स्टील बुद्धिबळ स्पर्धा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली . भारतीय उद्योजकांनी असे यश मिळवणे हा देखील अभिमानाचा
विषय आहे असो ) अत्यंत स्प्रुहनीय यश मिळवले आहे . टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे अबूधाबी खुली बुद्धिबळ स्पर्धा अश्या अनेक स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू आपल्या बौद्धिक चातुर्याचा बळावर खूपच कौतुकास्पद कामगिरी करत आहेत भारत भविष्यातील बुद्धिबळातील महासत्ता होण्याची दाट शक्यता आहे असा विश्वास बुद्धिबळ क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत ज्याचा एक महत्वाच्या टप्पा विश्वनाथन आनंद यांची फिडेच्या उपमुख्य अध्यक्षपदी ( (deputy president) निवड झाल्याने गाठला गेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये#ही_माझी_एक_हजार_
सत्तेचाळिसावी_ब्लॉगपोस्ट_आहे
टिप्पण्या