चित्रपटातील गीत ते 2+2 बैठक, मार्गे G-4 भारत जपान मैत्रीचा प्रवास
जपान , उगवत्या सूर्याचा देश , जगात सर्वाधिक भूकंप होणारा देश , भारताच्या चीनविरोधी आघाडीतील महत्त्वाचा देश , जुन्या हिंदी चित्रपटातील सिने दिगर्शक ज्या देशाच्या अल्पावधीत झालेल्या प्रगतीमुळे भारावून गेले तो देश म्हणजे जपान , आत्ताआत्ता पर्यंत भारतातील बाळ गोपाळांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या डोरेमॉन , सिंच्यान निज्जा हतोरी आदी अनेक कार्टून चा निर्माता असणारा देश म्हणजे जपान , स्वामी विवेकानंद यांनी ज्या२ देशाचा उल्लेख सध्या ते निद्रिस्त ड्रॅगन आहेत जे उठल्यावर जगाची झोप उडवतील अशा उल्लेख केला होता त्यातील एक देश म्हणजे जपान . ज्या देशाबरोबर आपल्या भारताच्या नियमित बैठका होतात अश्या जगातील मोजक्या देशांपैकी एक म्हणजे जपान ज्या देशाच्या तांत्रिक साह्यावर आपल्याकडे अनेक सोईसुविधा उभारण्याचे कार्य सुरु आहे तो देश म्हणजे जपान .
येत्या ७ सप्टेबरपासून भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर
आणि सरंक्षण मंत्री राजनाथसिंग हे दुसऱ्या भारत जपान २ +२ बैठकीसाठी टोकियोला
जाणार आहेत याच्या आधीची भारत जपान २+२ मिटिंग ही नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्लीत
झाली होती ७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या बैठकीत जपानचे सरंक्षण मंत्री
यासुकाझू हामाडा ( Yasukazu Hamada )आणि जपानचे परराष्ट्रमंत्री योषिमासा
हयासी Yoshimasa Hayashi) हे सहभागी होणार आहेत भारत फक्त जगातील ४ देशांशी अशी चर्चा करतो जपान हा त्यातील एक आहे जपानबरोबर या बैठकीमध्ये
कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली , कोणत्या मुद्यावर करार आणि Memorandum
Of Understanding (MOU ) झाले . याची माहिती आपणास पारंपरिक
माध्यमांतून आपणास मिळेलच. मला आपणाचे लक्ष वेधून
घेयचे आहे . ते भारताचा इथपर्यंत प्रवास कसा
झाला ? तर सुरवात करूया सविस्तर विवेचनला .
मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपानच्या ताकदीच्या सर्वप्रथम उल्लेख स्वामी विवेकांनद यांच्या पहिल्या अमेरिकेच्या प्रवासात येते . त्यांनी त्या वेळेस म्हणून ठेवले आहेच. चीन
आणि जपान निद्रिस्त ड्रॅगन आहेत . ते जेव्हा जागे होतील तेव्हा जगाची झोप उद्वातील मात्र हा झाला ब्रिटिश इंडियातील उल्लेख .स्वातंत्रप्राप्तीनंतर जपानच्या ताकदीच्या उल्लेख येतो तो राजकपूर याचा श्री 420 या चित्रपटात " मेरा जुता है जपानी " हे अजरामर गाणे आपल्याला अल्पावधीत जपानने केलेल्या प्रगतीची साक्ष देते .जपानने केलेल्या प्रगतीची घोडदौड सुरूच असून बहुचर्चित बुलेट ट्रेंनपासून विविध खत निर्मितीतीच्या प्रकल्पापर्यंत जपान आपणास साह्य करत आहे .राजनैतिकी भूगोलाच्या शेजारील राष्ट्राच्या पलीकडे असणारे राष्ट्र आपले मित्र या सिद्धान्तानुसार आपण जपानशी 1962 च्या युध्द्दांनंतर संबंध वाढवण्यास सुरवात केली . हे साह्य नंतर अनेक क्षेत्रात विस्तारले . संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकारासह कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी जर्मनी आणि ब्राझील समवेत G 4 या गटाची स्थापना करणे , आदीपर्यंत हा प्रवास झालेला दिसतो. नुकतीच झालेली मंत्रिपरिषदेची 2+2 बैठक या विषयीचा कळस म्हणता येईल . या आतापर्यंतचा वाटचालीत अनेक चढ उतार आले . उदाहरणार्थ जेव्हा भारताने अणुस्फोट केला त्यावेळी जपानने आपल्यावर अनेक बंधने लादली . आणि आपले संबंध काही प्रमाणात दुरावले चीनच्या वाढत्या सागरी महत्त्कांक्षालेला आळा घालणे सोईचे व्हावे यासाठी अनेकदा जपानी आरमार आणि भारतीय नौदल हिंदी महासागरात संयुक्त आरमारी कवायती करत असतात अमेरिका प्रणित क्याड या चीनविरोधी समूहात देखील भारत जपान सहकार्य करत आहेत अनेक जपानी कंपन्या भारतात रसायन शास्त्र तसेच अन्य अनेक क्षेत्रात कार्यरत आहेच. भारतातील दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात होंडा या वाहन उद्योग क्षेत्रातील कंपनीची उलाढाल आपणांस माहिती आहेच .
. त्याचप्रमाणे जपानी व्यवस्थापनाविषयी
देखील काही लोकांना माहिती असेलच , आपल्या भारताच्या अनेक
कारखान्यात त्या व्यवस्थापन तत्वावर आधारित काम केले जाऊन अत्यंत कमी श्रमात अधिक
उत्पादन काढले जाते . जपानी कार्टून विश्वाने भारतीय
समस्त बालविश्व व्यापून गेलेले आपण बघतो आहेच , डोरेमॉन ,
निन्जा हतोरी हि त्याची काही उदाहरणे
याच्या
आधी याच २०२२ वर्षी १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा आपले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारत भेटीला आले होते त्यावेळी जपान येत्या पाच वर्षात भारतांमध्ये ३ लाख २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
करणार असल्याची घोषणा केली अमेरिकी चालनामध्ये याचे मूल्य ४ अब्ज २० कोटी डॉलर
होते तर जपानच्या चलनात ५ ट्रीलीयन येन इतके होते
याच्या आधी सन २०१४ मध्य जपानचे तत्कलीन पंतप्रधान योसिका मोरी यांनी जपान येत्या
५ वर्षात भरता ३. ५ ट्रीलीयन येन गुंतवूणक करणार
असल्याची घोषणा केली होती विविध ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या माध्यमातून आपण ती
अनुभवत सुद्धा आहोत
७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या भारत जपान २ + २ या बैठकीमुळे यात वाढच होईल हे नक्की
टिप्पण्या