बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

     


  आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात. आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतातमानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके, सिने निर्माते, सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात. या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक, सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत कीज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे होता, काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते. दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो. अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत्तत्यांचा मृत्यूस सन 2022  ऑक्टोबर 10 रोजी 58 वर्षे पूर्ण होत आहेतत्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .

आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या

बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त.

               जागतिक कीर्तीच्या टाइम्स मॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तम अश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता, तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्त यांची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्या 20 वर्षाचा कालावधीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले. गुरुदत्त यांची सिने कारकीर्द जर अजून बहरली असती तर भारताच्या झोळीत ऑस्करचे किमान 2 ते  3 पदके नक्की आले असते . या बाबत कुणालाच शंका असायला नको .  अनेक प्रतिभावानं  मिळते तसे अल्पायुष्य त्यांना मिळाले . उणापुऱ्या 39 वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत हिमलयाएव्हढे कार्य केले . त्यांनी तेलगू भाषिक अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्परणाची संधी दिली . एकेकाळी बेस्ट मध्ये कन्डक्टर असणाऱ्या जॉनी वॊकर यांना आपल्या अनेक चित्रपटात संधी देऊन त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवेश सुकर केला

   आज गुरुदत्त यांना आपल्यामधून जावून 50 वर्षांपेक्षा अधिक कालखंड उलटला आहे. मात्र त्यांचे चित्रपट आज देखील काळजाला भिडतात, आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाचा समाजावरील परीणाम त्यांना पुर्णपणे माहिती असल्याचे त्यांचे चित्रपट बघताना वारंवार जाणवते. गुरुदत्त हे काळाच्या पुढे बघणारे सिने दिग्दर्शक , सिने निर्माते होते. त्यांनी तयार

केलेल्या चित्रपटांचे कथानक आपणास खिळवून ठेवते पटकथेवर.त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे त्यांचे चित्रपट बघताना समजते.आपणास हवे असणारे दृश्य चित्रीत करण्यासाठी प्रकाश योजना कस्या प्रकारे हवी आहे. याचा फारच बारकाईने अभ्यास केल्याचे त्यांचा चित्रपटातून दिसते. कागज के फूल या चित्रपटातून ते स्पष्टपणे जाणवते सुद्धानेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त

       नेहमी प्रयोगशील असणारे गुरुदत्त मनाने मात्र प्रचंड हळवे होते. एखाद्यावर त्यांचे चटकन प्रेम जडत असे.  त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. आपल्या कलाकृतीवर ते प्रचंड प्रेम करत, दुसऱ्या व्यक्तीने व्यावसायिक यशापशयाचा विचार करून त्यांचा कलाकृतीमध्ये बदल सुचवला तरी ते त्याबाबत फारसे तयार नसत. त्यांनीच पुढे आणलेल्या अलबार अल्वी यांनी त्यांचा गुरुदत्त यांचाबरोबर सहवासाचे वर्णन करणारे ten years with Guru dutt नावाचे पुस्तक लिहले आहे,त्यात ही बाब विशेष स्पष्ट करून सांगितली आहे. त्यांचा हळव्या मनाचे प्रत्यंतर त्यांचा वैयक्तिक आयुष्यात उमटलेले दिसते.गीता दत्त बाली यांच्या बरोबरचे वादळी वैवाहिक आयुष्य, वहिदा रेहमान यांच्या बरोबरचे अयशस्वी फुललेले प्रेम जीवन याचीच साक्ष देतात.

           प्रेमाच्या कात्रीत अडकून त्यांचे 10 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत काहीश्या एकाकी अवस्थेत त्यांचे अकस्मित असे निधन झाले . निधनाप्रसंगी त्यांच्या प्लेटमध्ये फक्त त्यांचा एक विश्वासू नोकर सोबतीला होता .

त्यांची पत्नी,  मुले, अथवा प्रेयसी त्यांच्याबरोबर नव्हती . त्यांचे निधन  ही  त्यांनी जाणूनबुजून केलेली आत्महत्या होती , की प्रचंड नैराश्य आल्याने घेतलेले मद्य आणि अनावधानाने घेतलेल्या झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्याचे निधन झाले या बाबत निश्चित असे काहीही सांगता येणे अवघड आहे . त्यांचे 9 ऑक्टोबर 1964  रोजी रात्री फोनवर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांच्याबरोबर प्रचंड वाद झाला होता . त्या वादाच्या वेळी त्यांनी आपल्या पत्नीस जर तू आपल्या मुलांना मला भेटायला घेऊन आली नाहीस तर माझे मृत शरीर बघशील असे सांगितले होते . मात्र तरी देखील त्यांची पत्नी गीता दत्त यांनी आपल्या मुलांना  गुरुदत्तांकडे घेऊन जाण्यास नकार दिला . आणि 10 ऑक्टोबर 1964  रोजी त्यांचे शरीर त्यांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत सापडले आणि भारतीय एका मनस्वी , हळव्या कलाप्रधान सिने अभिनेता , सिने दिग्दर्शक, सिने निर्माता , सिने दिग्दर्शक असणाऱ्या गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर याना कायमचे मुकला  त्यांचा
निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीची झालेली हानी भरून निघणे अशक्यच आहे . मात्र त्यांच्यावर जशी वेळ आली तशी अन्य कोणावरही ना येवो अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?