सिंहावलोकन २०२२ क्रीडा,
सरते २०२२ हे वर्ष क्रीडा जगताचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . जागतिक स्तराचा विचार करता अनेक वाद प्रतिवाद , टीका यावर्षी क्रीडा जगतात झाले एका संघाच्या समर्थकांनी दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांशी प्राण जाईल इतक्या टोकाची मारामारी करण्याची घटना देखील यावर्षी जगाने अनुभवली . जगातिक स्तरावर मनाचा समजल्या जाणाऱ्या आणि काही वर्षांच्या अंतराने होणाऱ्या दोन स्पर्धा यावर्षी झाल्या . एक भारतासाठी अत्यंत महत्वाची मात्र क्रीडा जगतात फारशी महत्वाची न मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत एक धक्कादायक पराभवाला भारताला सम्रोरे जावे लागले ते या बघता हे वर्ष भारतासह जगसाठी अत्यंत वादळी ठरले
या वर्षाची सुरवातच मुळी झाली राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक
जेकोविच यास त्याने कोव्हीड १९ चे लसीकरण पूर्ण न केल्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या वेळापत्रकातील पहिली स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवर येण्यास ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी प्रखर विरोध केल्याचा घटनेने आम्ही कोणत्याही स्थितीत धोका पत्करून शकत नाही अशी भूमिका घेत त्यांनी विरोध केला ज्यामुळे नोवाक जेकोविचला हि स्पर्धा खेळता आली नाही
भारतीयांची जगाला असणाऱ्या अनेक देणग्यांपैकी एक असणाऱ्या बुद्धिबळ या खेळाविषयी बोलायचे झाल्यास भारत आणि जगाच्या विचार करता अत्यंत वादळी ठरले या खेळातील घडामोडींचा विचार करतात प्रथम जगाचा विचार करूया तर मित्रानो या वर्षी दोन घडामोडीनी बुद्धिबळ विश्व हादरले एक म्हणजे पुढील विश्वविजेता स्पर्धा खेळण्याबाबत विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन उत्सुक नसल्याचे त्यांनी जाहीर केल्याची एक घटना आहे सातत्याने होणाऱ्या या स्पर्धेचा कंटाळा आल्याने मी
हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी जाहीर केले तर दुसरी घटना आहे मॅग्नस कार्लसन यांनी ज्युलियस बेअर जनरेशन कप मध्ये ग्रँडमास्टर हान्स हंस मोके निमन यांच्या समवेत खेळायला दिलेला नकार पूर्णतः बुद्धी कौशल्यावर आधारलेल्या बुद्धिबळ या खेळात सादर डाव खेळताना ग्रँडमास्टर हान्स हंस मोके हे अयोग्य पद्धतीने तंत्रज्ञाचा वापर करत खोटेपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी खेळायला नकार दिला होता भारताच्या अर्थाने या बाबतीत विचार करायचा झाल्यास हे वर्ष अनेक अर्थाने वेगळे होते यावर्षी ऑगस्ट महिन्यात बुद्धिबळाच्या ऑलम्पियाडचे आयोजन भारतात करण्यात आले होते या स्पर्धंतील आतापर्यतचे सर्वाधिक संघ यावेळी सहभागी झाले होते . रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाकडून हे
आयोजन काढून घेतल्यानंतर विक्रमी वेळेत सर्व व्यवस्था करत हे ऑलम्पियाड खेळवण्यात आले होते या खेरीज भारतीय बुद्धिबळपटूंनी देखील या वर्षी अत्यंत चमकदार कामगिरी केली यावर्षी शेवटचा रविवार पर्यंत मराठ्मोठ्या नागपूरच्या रहिवाशी असलेल्या दिव्या देशमुख आणि तेलंगणाच्या प्रियंका नुटक्की या महिला ग्रँमास्टर पदाला गवसणी घातली दिव्या देशमुख आणि प्रियंका नुटक्की यांच्यासह अन्य तीन बुद्धिबळपटूंनी ग्रँडमास्टर हा 'किताब यावर्षी प्राप्त केला रमेशबाबू प्रगण्यानंद असे नाव असणाऱ्या मात्र आर प्रगण्यानंद या नावाने परिचित असलेल्या भारताच्या युवा ग्रँडमास्टरने विद्यमान विश्वविजेता पदासह एकूण पाचवेळा विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम केला तसेच भारताने वेस्टर्न एशिया युथ चेस चॅम्पियनशिप 2022 मध्ये 13 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 29 पदके जिंकली आहेत. भारताने 105 पैकी 29 पदके जिंकली आहेत. काही वयोगटांमध्ये एकही भारतीय सहभागी नव्हता हे लक्षात घेऊन ही नक्कीच उत्कृष्ट कामगिरी आहे. साहिब सिंग,
यांनी १४ वर्षाखालील गटात यश संपादन केले फिडे मास्टर हर्षद एसने यांनी १८ वर्षाखालील रॅपिड आणि ब्लिट्झमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले, . 12 वर्षाखालील राष्ट्रीय खुल्या स्पर्धेतील विजेती गौतम कृष्णा एच आणि 18 वर्षांखालील मुलींची विजेती , महिला फिडे मास्टर भाग्यश्री पाटील यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली. सध्याच्या राष्ट्रीय कुमारी गटातील विजेती शुभी गुप्ताने तीन रौप्य पदके जिंकली. कोलकात्ता येथे झालेली टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत जलद बुद्धिबळ या प्रकारात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पहिल्या तिन्ही
भारतात विशेष लोकप्रिय असणाऱ्या
क्रिकेटच्या बाबतीत हे वर्ष अत्यंत वादळी ठरले यावर्षी मुळात श्रीलंकेत होणाऱ्या मात्र
तेथील आर्थिक अडचणीमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे युनाटेड अरब अमिरात या देशात आयोजित
करण्यात आलेल्या पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानने धक्कादायक हरवले गेल्या
काही वर्षातील स्पर्धांमध्ये झालेल्या सामन्यात नेहमी भारताचं पाकिस्तानविरुद्ध विजयी
होत होता तसेच पुढील वर्षी पाकिस्तानात होणारी आशिया चषक स्पर्धेत आम्ही खेळणार नाही
सदर स्पर्धा दुसऱ्या त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावी अशी मागणी भारतने केल्यावर
पाकिस्तानकडून पुढच्याच वर्षभारतातच होणाऱ्या एकदिवशीय विश्वचषकात आम्ही खेळणार
नाही असे जाहीर करण्यात आले तसेच ऑस्ट्रेलिया या देशात झालेल्या टी २० विश्वचषकादरम्यान
पाकिस्तानी पुरुष संघ आणि अफगाणिस्तान पुरुष संघात झालेल्या सामान्यास
हिंसेचे गालबोळ लागले
आपल्या महाराष्ट्रत कोल्हापूर आणि भारताचा विचार करता गोवा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विशेष लोकप्रिय असलेल्या फ़ुटबाँलचा विचार केला असता हे वर्ष अत्यंत वादळी ठरले इंडोनेशिया बीआरआई लीग या स्पर्धेत अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या दोन संघात झालेलया सामन्याला हिंसाचाराचे गालबोट लागले हा सामना पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला पोलिसांच्या या.कृतीमुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये ३४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १८० हुन अधिक जण गंभीर जखमी झाले तसेच इतिहासात पहिल्यांदाच कतार या आखाती देशात जगात पहिल्यांदा फ़ुटबाँलच्या विश्वचषकाच्या
सामन्याचे आयोजन करण्यात आले या आयोजनावर अनेक बाजूने टीका करण्यात आली या आयोजनात मानवी हक्काची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला धार्मिक विचारांचा पगड असलेल्या कतार या देशात होणाऱ्या या विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान उत्साह साजरा करण्यावर अनेक बंधने होती एकंदरीत २००२२ हे वर्षक्रीडाविश्वाच्या
बाबतीत अत्यंत वादळी ठरले हेच खरे
टिप्पण्या