राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने -
भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ? राजस्थान आणि गुजरात या राज्यातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात व्यवसायात का आहेत ? पंजाबला धान्याचे कोठार म्हणून का ओळखले जाते ? सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ?सध्या मोठ्या प्रमाणत चर्चिला जाणारा जोशी मठाचा प्रश्न मुळात का निर्माण झाला अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,
भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military geography )वगैरे . मात्र शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो . तो परत
स्थापित व्हावा या साठी साजरा करण्यात येतो तो राष्ट्रीय हवामान दिवस . जो मकर संक्रांती च्या दिवशी साजरा करण्यात येतो . त्या निमित्याने भूगोल विषयावर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आपल्या पांरपारिक मान्यतेनुसार मकर संक्रातीपासून उत्तरायण सुरु होते . (वास्तविक २२ डिसेंबरपासूनच ते सुरु झालेलं आहे )) ज्यास आपल्याकडे धार्मिक मान्यतेनुसार मोठे महत्व आहे महाभारत युद्धाच्यावेळी पितामह भीष्म यांनी आपले प्राण उत्तरायण सुरु होण्यापर्यंत रोखून धरले होते मकर संकृतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत आभासी पद्धतीने प्रवेश करतो हा मुद्दा लक्षात घेऊन या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यात येतो
छ्त्रपती शिवाजी महाराज यांची युद्धदनीती हि लष्करी भूगोलावर आधारित होती .पानिपतच्या तिसऱ्या युध्दात अब्दालीने केलेल्या चढाईत त्या भागाच्या प्राकृतिक रचनेने मोठा भाग असल्याचे आपणास सहज दिसते प्राकृतिक रचनेचा अभ्यास हा भूगोलाशी संबंधित आहे .
आपले राजस्थानी आणि गुजराती बांधव पिढीजात व्यवसाय करू शकतात . याची करणे तेथील भौगोलिक परिस्थीशीं परिणाम साधणारी आहेत . आपल्याकडे हिवाळ्यात पक्षी येतात . याचे कारण सुध्द्दा भूगोलाशी संबंधित आहे . सध्या आपण अत्यंत विषम हवामान अनुभवतो आहोत याचा सुध्द्दा अभ्यास भूगोलात करण्यात येतो कोकणातील घरे उतरत्या छपराची असतात यामागे सुध्द्दा भूगोलाच कारणीभूत असतो .
भूगोल विषय नावडता होण्यासाठी एक घटक म्हणजे त्याची परिभाषा. आपण सर्वसामान्य भाषेत ज्याला पाऊस म्हणतो त्यास भूगोलाच्या तांत्रिक भाषेत पर्जन्य म्हणतात . या परिभाषिक शब्दांमुळे विषय क्लिष्ट होतो . नावड निर्माण होण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे त्याच प्रमाणे राजकीय भूगोलाला शालेय क्षिक्षणत देण्यात आलेले अवास्तव महत्व . कोणता देश कुठे आहे ? याचे माझ्या रोजच्या आयुष्यात प्रयोजन काय ? हे समजावून घेण्यात आपण कमी पडतो त्यामुळे या विषयाबाबत उत्सुकता निर्माण होत नाही मात्र कला आणि शास्त्र या दोन्ही शाखेचा
संगम असलेला भूगोल हा विषय अत्यंत रंजक आहे . भूगोल हा विषय कला शाखेचा समजला जात असला तरी भूगोल विषयाचे अधिकचे ज्ञान घेताना अनेक शास्त्रीय संकल्पनांचा वापर करावा लागतो शास्त्र शाखेतील विद्यर्थी करतात त्या प्रमाणे तासोन्तासप्रात्यक्षिके करावी लागतात अनेक विद्यापीठात भूगोल हा विषय शास्त्र शाखेतील विषय म्हणून शिकवला जातो केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC ) कडून नागरी सेवेशिवाय (CIVIL
SERVICE EXAM ) ज्यापरीक्षा घेतल्या जातात .
त्यामध्ये भूगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाते .पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय भूगोल दिनाच्या शुभेच्छा . भूगोलाच्या अभ्यास या भूगोल दिनापासून सुरवात करताय ना मग
टिप्पण्या