दादासाहेब फाळके ऋषितुल्य व्यक्तिमत्व

           

    16 फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2023या वर्षी  गोष्टीला 77वर्षे पुर्ण होउन 78वे वर्ष  सुरु झाले आहे . या 78वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .आजमितीस त्यांच्या कोणीही वंशज चित्रपटश्रुष्टीत कार्यरत  नाही म्हणून त्यांचे योगदानाची फारशी दखल घेण्यात येत नाही फक्त दादासाहेब फाळके 
पुरस्काराच्या वेळीच त्यांचा काय तो उल्लेख होतो इतकेच भारतरत्नाचे खरे वारसदार असून देखील त्यांना भारतरत्न द्यावे याबाबत कधीही आवाज उठवला जात नाही  हे दुर्दैवाचेच आहे 
          आज भारताची फार मोठी ओळख बॉलिवूडमुळे होते भारत रशिया यांच्या राजनीतिक संबंधाचा विचार करताना सातत्याने राजकपूरचा प्रभाव रशियन जनतेवर असल्याचे बोलले जाते भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून याकडे बघितले जाते मात्र राजकपूर ज्या क्षेत्रात कार्यरत होते त्या क्षेत्राचा  जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या मात्र यावेळी विसर पडतो भारत पाकिस्तान यांच्या संबंधाचा विचार करतानापाकिस्तानात बॉलीवूड लोकप्रिय असल्याचे सातत्याने सांगण्यात येते मात्र त्याचे जनक महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे हे विसरणे योग्य नाही मिफ्ता सारखे पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे दुबई शारजा आदी अनेक ठिकाणी भारताची वेगळी ओळख आहे हे सोहळे बॉलिवूडमुळे होऊ शकतात ज्याची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांच्यामुळे आहे ज्यांच्या वारसा जतन करणे हि आपली जवाबदारी आहे हे नाकारण्यात काही अर्थ नाही 
                      त्र्यंबकेश्वर येथील कुशार्वता शेजारील एका गल्लीत त्यांचे घर आहे, असे म्हणतात . मी त्या ठिकाणी हे समजल्यापासून दोन तीनदा गेलो आहे .पुण्यात काही ठिकाणी ज्या प्रमाणे काही घरांवर या ठिकाणी हे रहात होते ,अस्या पाट्या दिसतात .त्या प्रमाणे मला एकही पाटी पण दिसली नाहीये. मी रहातो त्या नाशिकमध्ये त्यांचा नावाने एक स्मारक आहे, हीच ती काय आनंदाची गोष्ट. .त्यांचे चरीत्र युट्युब या समाज माध्यमांवर ऐकत असताना ते काही काळ नाशिकला असल्याचे समजले . मात्र कवीवर्य कुसुमाग्रजांसारखे त्याचे निवास सुप्रसिद्ध का नाही?हे मला तरी समजत नाही .नाशकात असलेल्या स्मारकाची स्थिती फार उत्तम आहे असेनव्हे मात्र वासरात लंगडी गाय शहाणी या नात्याने काहीच नसल्यापेक्षा असुविधाने परिपूर्ण अश्या स्थितीतील का होईना पण स्मारक आहे हेही नसे थोडके असो 
             नाही म्हणायला , त्यांचा कार्यावर आधारीत "हरीशचंद्राची फँक्टरी "हा मराठीत चित्रपट आहे . मात्र  स्मारक जिवंत असले तर त्यात मज्जा असते , असे मला वाटते . त्यांचे जिवंत स्मारक हे चित्रपटातून नव्हे, तर ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते , त्या ठिकाणाचे ऐताहासिक स्वरूप ठेवून होते, असे मला वाटते . यावर मतमतांतरे असू शकतात , याची मला जाणीव आहे. आपल्या मत़ाचे स्वागतच आहे . सध्या अनेक दक्षिणी भाषेतील चित्रपटांचे हिंदीत

अनुवाद प्रदर्शित केले जातात  ज्यामध्ये फक्त मनोरंजन होते मात्र  हरीशचंद्राची फँक्टरी या चित्रपटबाबत असे म्हणता येऊ शकत नाही या चित्रपटाचे शक्य तितक्या भाषेत अनुवाद करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासासाठी कार्य केल्यास ते सोन्याहून पिवळे होईल हे मात्र १००% खरे आहे हे कोणीही नाकारू शकत नाही 
        दासाहेब  फाळके यांच्या नावे जरी भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे समजले पुरस्कार देण्यात येत असले तरी त्याहुन अधिक काम होणे अत्यावश्यक आहे .माझ्या माहितीनुसार फाळके यांनी 1913ते 1937 पर्यंत चित्रपट निर्मिती केली . वर्षांमध्ये मोजल्यास हा कालावधी तब्बल 24वर्षे आहे . गंगावतरण हा त्यांचा अखेरचा चित्रपट , जो त्यांनी निर्माण केलेला एकमेव बोलपट देखील आहे .त्यांच्या स्मृती दिनी त्यांंना मानाचा मुजरा करुन सध्यापुरतो थांबतो 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?