राजकारणाचे अथपासून इथीपर्यत उलगडणारी कांदबरी सिंहासन

    आपल्या मराठीला अनेक चांगल्या कादंबरीची मोठी दिर्घ परंपरा लाभलेली आहे. या या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी अनेकदा ऐतिहासिक तसेच सद्य स्थितीवर आधारीत आहे.
कादंबरीवर अनेक  उत्तमोत्तम चित्रपट देखील निघाले आहेत. अस्याच कांदबरी आधारीत एक उत्कृष्ट चित्रपट जो सद्य स्थितीवर भाष्य करतो असा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित होवून ४४वर्षे पुर्ण झाली तरी आज देखील ताजातवाना वाटतो असा मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीवर आधारीत मल्टीस्टार असलेला चित्रपट सिंहासन .
तर मित्रांनो हा उत्कृष्ट चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारीत आहे.त्यातील एक म्हणजे "सिंहासन" मी नुकतीच वाचली.ज्यामुळे सिंहासन  या अजरामर ठरेल अस्या या चित्रपटाची कथा तितकीच सशक्त आहे, हे मला समजले. ज्या प्रमाणे चित्रपट सुरवातीपासून आपली पकड घेतो त्या प्रमाणेच कांदबरी देखील आपल्या मनाचा लगेच ठाव घेते.कांदबरीत पार्श्वभूमीवर फारसी पाने ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी खर्ची पाडलेली नाही. सुरवातीच्या जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या पानांमध्येच त्यांनी कांदबरीसाठी पार्श्वभूमी उभारली आहे.
      चित्रपटाप्रमाणेच कांदबरी सुरवात देखील अनेक नाट्यमय प्रसंगातून होते. कांदबरी सुद्धा अनेक नायकाभोवती फिरते,त्यातील एक नायक म्हणजे पत्रकार दिगू .त्याला एका आमदाराचा फोन येतो ज्यात तो अर्थमंत्री विश्वासराव  दाभाडे मुख्यमंत्र्यांविरोधात उठाव करून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे सांगतो दिगू  माहितगारांकडून त्याबाबत खातरजमा करण्यासाठी विविध फोन करतो दरम्यान ही बातमी अन्य आमदारांना समजते आणि कांदबरीतील नाट्याला सुरवात होते.जे पुढच्या सुमारे ३१५ पानांवर उत्तरोत्तर रंगत जाते‌.चित्रपटात शेवटी दाखवल्याप्रमाणे  कांदबरीत मुख्यमंत्री अर्थमंत्र्यावर त्याचाच डाव उलथून लावतात. मात्र चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिगू या पत्रकाराला कांदबरीत वेड लागतं नाही तर तो वार्तांकन करण्याचे सोडून देवून उपसंपदकाची नोकरी स्वीकारण्याचे मनोमन ठरवत आपल्या प्रेयसीसोबत क्रीडा करायला लागतो‌ चित्रपटात  मुख्य पात्रांपैकी एक असणारे डिकास्टा हे पात्र  सिंहासन या कांदबरीत फार ठळक केलेले नाही,त्यांचा ओझरता उल्लेख तीन ते चार पानात येतो.
मला मुळ चित्रपट माहिती असल्याने मी कांदबरी वाचताना सातत्याने सदर प्रसंग चित्रपटात कुठे आहे याचा शोध मनात घेत होतो‌.या शोधात या कथेवरून चित्रपटाची पटकथा लिहिताना त्यात अनेक ठिकाणी बदल केल्याचे मला जाणवले अर्थात ते स्वातंत्र्य पटकथाकारास आहेच‌.मी या सुप्रसिद्ध पुस्तकांची अकरावी आवृत्ती वाचली.या आवृत्तीत पुस्तकाच्या सुरुवातीलाच अन्य मालिकांप्रमाणे कथानक काल्पनिक असून यात सत्यस्थिती आढळल्यास तो योगायोग समजावा असे लिहिलेले आहे.मात्र कांदबरी वाचताना सातत्याने हे सत्य घटनेचेच नाट्यरुपांतर तर नाही असी शंका आपणास यावी इतक्या मोठ्या प्रमाणात सत्यता या कांदबरीत पदोपदी जाणवते. 
या कादंबरीवर आधारित चित्रपट मराठीतीलच नव्हे तर भारतातील उत्कृष्ट राजकीय चित्रपट असला आणि तो समजायला सोपा असला तरी चित्रपट मुळातून समजायला ही कांदबरी वाचायलाच हवी.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?