नव्या जगाची आशा भारत
आपल्या महाराष्टात मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरु असताना, आपल्या भारताच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक घटना घडल्या , या कालावधी भूतानच्या राजाची आणि मलेशियाच्या परराष्ट्र मंत्र्याची भारत भेट आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अनुक्रमे पोर्तुगाल आणि इटली या देशांच्या दौरा या घडामोडी घडल्या या घटनांच्या आपल्यावर देखील मोठा परिणाम होणार असल्याने त्या आपणास देखील माहिती असणे अत्यावश्यक आहे चला तर जाणून घेऊया या घडामोडी
भूतानचे राजे, महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, भूतानच्या शाही सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत, ३ ते १० नोव्हेंबर या या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर असतील. भेटीदरम्यान, भूतानचे महामहिम राजे भारताच्या पंतप्रधानांना भेटतील. परराष्ट्र मंत्री आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी महामहिम भूतानचे राजे यांची भेट घेतील. भूतानचे महामहिम राजे आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांनाही भेट देणार आहेत.भूतानमध्ये इंग्लडसारखी घटनादत्त राजेशाही आहे लोकांची मागणी नसताना बदलत्या काळाची पाऊले उचलत भूतानच्या राजाने आपले अधिकार कमी करत देशात लोकशाहीची स्थापना केली आहे पाकिस्तान आणि नेपाळमधील लोकशाहीचा खेळ बघता त्याच दक्षिण आशियात भूतानने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे
भूतानमधील डोंगरचा वापर करत जलविद्युत प्रकल्पाद्वारे ईशान्य भारतातला ऊर्जा संपन्न करण्याचे अनेक प्रकल्प सध्या सुरु आहेत भूतानला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारच्या बॉर्डर रोड ऑर्गन
नेला होता या लक्षरी कारवाईचा राग आल्याने त्यानंतर सुमारे ९ वर्ष म्हणजे १९७० पर्यंत भारताशी राजनीतिक संबंध प्रस्थापित केले नव्हते या बाबींचचा विचार करत आपण हि बाब अभ्यासाव्या लागतील
झेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सूर आहेत भूतानच्या परराष्ट्र धोरणनावर भारताचा मोठा प्रभाव आहे चीन बरोबर असलेल्या आपल्या युद्धात भूतान मोठी भूमिका बजवावतो त्या पार्श्वभूमीवर आपण हा दौरा बघायला हवा
परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून ,आयोगस्तरीय बैठकीसाठी मलेशियाचे परराष्ट्रमंत्री , डॉ.झाम्बरी अब्दुल कादिर ६ आणि ७ नोव्हेंबर या दोन दिवशी रोजी भारताला भेट देतील. त्यावेळी ते भारत आणि मलेशियाच्या दरम्यान होणाऱ्या उच्स्तरीयय बैठिकेचे सह अध्यक्षपद भूषवतील नवी दिल्ली येथे ७ नोव्हेंबर रोजी उच्चस्तरीय बैठक होईल भारत आणि मलेशियातील ही या प्रकराची सहावी बैठक असेल
या उच्चस्तरीय बैठकित मलेशियासोबतच्या राजकीय, संरक्षण, सुरक्षा, आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन आणि लोकांशी असलेले संबंध या क्षेत्रातील वर्धित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चेसाठी व्यासपीठ देखील उभारण्याबाबत देखील चर्चा होईल त्यांच्या भेटीदरम्यान डॉ. झांब्री अब्दुल कादिर हे भारताचे उप्राष्ट्रपतींची देखील भेट घेतील
मलेशिया या देशात अनेक भारतीय पर्यटनासाठी जात असतात मलेशिया भारताच्या लुक इस्ट पॉलिसीचा महत्वाचा साथीदार आहे आशियान या मलेशिया सदस्य असलेल्या संघटनेच्या अधिवेशनाला विशेष निमंत्रित म्हणून भारत सातत्याने उपस्थित राहत आला आहे मलेशियावर आपल्या भारतासारखेच ब्रिटिशांचे राज होते या मुद्यांच्या आधारे या बैठकीचा विचार होणे आवश्यक आहे
एकीकडे भूतानचे राजे आणि मलेशियाचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीवर आले असताना ऑक्टोबरचे शेवटचे दोन
दिवस आणि नोव्हेंबरचे पहिले तीन दिवस आपले पराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर अनुक्रमे पोर्तुगाल आणि इटलीच्या दौऱयावर होते आता त्याची माहिती बघूया
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पोर्तुगालला भेट दिली.डॉ जयशंकर यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा आणि पोर्तुगीज संसदेचे अध्यक्ष ऑगस्टो सॅंटोस सिल्वा आणि पोर्तुगालचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली.पोर्तुगलचे परराष्ट्र मंत्री जोआओ गोम्स क्रेविन्हो.यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान कोस्टा यांनी भारत आणि पोर्तुगाल तसेच युरोपीय युनियन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी आपल्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला. आपले परराष्ट्र मंत्री आणि इटलीच्या संसदेचे अध्यक्ष सॅंटोस सिल्वा यांनी आपल्या लोकशाही दरम्यान सहकार्य वाढवण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. डॉ जयशंकर यांनी पोर्तुगाल-भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांचीही भेट घेतली.आपल्या परराष्ट मंत्र्यांनी पोर्तुगालचे अर्थमंत्री Cravinho सोबत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीवर विस्तृत चर्चा केली. त्यांनी नियमितपणे होत असलेल्या उच्चस्तरीय राजकीय देवाणघेवाणीवर समाधान व्यक्त केले आणि व्यापार आणि गुंतवणुकीवर तसेच आयटी, आरोग्य आणि औषधनिर्माण, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण उद्योग, स्टार्ट-अप आणि तरुण, व्यावसायिक आणि कुशल यांची गतिशीलता यासह अनेक क्षेत्रांमधील वाढत्या संभाव्यतेवर चर्चा केली.
दोन्ही बाजूंनी पोर्तुगीज प्रजासत्ताकमध्ये काम करण्यासाठी भारतीय नागरिकांच्या भरतीवरील कराराचे संपूर्ण फायदे लक्षात घेऊन आणि भारत पोर्तुगाल कॉन्सुलर संवाद सुरू करण्यासाठी पथदर्शी प्रकल्पासाठी मानक कार्यप्रणाली लागू करण्यास सहमती दर्शविली. त्यांनी द्विपक्षीय आर्थिक संबंधांचा आढावा घेण्यासाठी संयुक्त आर्थिक स
मितीची पुढील बैठक लवकरात लवकर घेण्याचा निर्णय घेतला. भारत EU संबंध, भारत मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC), युक्रेनमधील संघर्ष, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि इंडो-पॅसिफिक यासह महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचार विनिमय केला आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सागरी संग्रहालयालाही भेट दिली जिथे त्यांना गुजरातमधील लोथल येथे उभारण्यात येत असलेल्या सागरी हेरिटेज कॉम्प्लेक्सच्या विकासाबाबत दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या सहकार्याबद्दल माहिती देण्यात आली. भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात त्यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले. दोन्ही बाजूंनी 2025 मध्ये राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि पोर्तुगालचे अर्थमंत्री यांच्या दरम्यान2023-27 या कालावधीसाठी स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीवर दोन ) महत्त्वपूर्ण करार तसेच सांस्कृतिक सहकार्यावरील कार्यकारी कार्यक्रमावर स्वाक्षरी करण्यात आली या कारणामुळे सुरक्षित आणि कायदेशीर मार्गाने तरुण आणि कुशल कामगारांच्या गतिशीलतेला मोठी चालना देईल, ज्यामुळे लोकांशी संबंध, व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
आपल्या भारतात सर्वात प्रथम आलेले आणि सर्वात शेवटी देश सोडणारा वसाहतवादी देश म्हणून पोर्तुगाल ओळखला जातो पोर्तुगालच्या अमलाखाली दमनदिवा दादरा नगर हवेली आणि गोवा हा प्रदेश होता त्यातील गोवा हा आमचा एक प्रांत आहे अशी भूमिकापोर्तुगालची असल्याने र्त्यास स्वातंत्र्य देण्यास पोर्तुगाल तयार नव्हताभारतीय सरकारने लष्करी कार्वायूई करत गोवा स्वतन्र केला हे स्वतःवरीलआक्रमण समजून पोर्तुगालने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात
नेला होता या लक्षरी कारवाईचा राग आल्याने त्यानंतर सुमारे ९ वर्ष म्हणजे १९७० पर्यंत भारताशी राजनीतिक संबंध प्रस्थापित केले नव्हते या बाबींचचा विचार करत आपण हि बाब अभ्यासाव्या लागतील
भारताचे परराष्ट्र मंत्री , डॉ.एस. जयशंकर यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांच्या निमंत्रणावरून२ आणि ३ नोव्हेंबर 2023 दरम्यान इटलीचा दौरा केला . या दौऱ्यादरम्यान जयशंकर यांनी इटलीची राष्ट्रपती अ . सर्जियो मॅटारेला आणि इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो आणि एंटरप्रायझेस आणि मेड इन इटली मंत्री श्री अडोल्फो उर्सो यांची देखील भेट घेतली. त्यांनी इटलीच्या संसदेतील परराष्ट्र आणि संरक्षण व्यवहार तसेच युरोपीय युनियनविषयक व्यवहार बघणाऱ्या समित्यांना संबोधित केले, तसेच प्रमुख विचारवंत आणि विचारवंत नेत्यांशी संवाद साधला .
इटलीचे राष्ट्राध्यक्ष मटारेला यांच्या समवेत डॉ एस जयशंकर यांनी त्यांच्या भेटीदरम्यान, द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्यासाठी तसेच भारत इटली आणि भारत EU संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या मजबूत समर्थनाचा पुनरुच्चार केला. संरक्षण मंत्री, क्रोसेटो यांच्यासोबतच्य बैठकीत संरक्षण उत्पादनात (संरक्षण सहकार्यावर नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानंतर) आणि दहशतवादविरोधी, सायबर सुरक्षा आणि सागरी क्षेत्रामध्ये औद्योगिक सहकार्यासह धोरणात्मक सहकार्य वाढवण्याबाबाबत चर्चा केली वरिष्ठ मंत्री उर्सा उर्सो यांच्यासोबत त्यांनी कृषी तंत्रज्ञान, अभियांत्रिकी,डिजिटल पायाभूत सुविधा, नावीन्य आणि अवकाश या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.आपले परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि इटलीच्या अर्थमंत्र्यादरम्यान i यांनी भारत इटली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या संपूर्ण टप्प्याचा आढावा घेतला. नियमित उच्च स्तरीय देवाणघेवाण आणि परस्पर संवाद, आर्थिक सहयोग, संरक्षण आणि सुरक्षा,, संस्कृती आणि लोकांशी संपर्क यासह आमच्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रात स्थिर वाढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. नवीकरणीय ऊर्जा, आयटी आणि स्टार्टअप्स, डिजिटल पायाभूत सुविधा, नावीन्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे यावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवलआघाडीच्या 10 अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या आपल्या दोन देशांमधील आर्थिक भागीदारी जागतिक पुरवठा साखळीच्या वैविध्यतेसाठी महत्त्वाची आहे, त्यांची संबंधित ताकद लक्षात घेता.मंत्र्यांनी महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, दिल्लीतील भारताचे यशस्वी G20 अध्यक्षपद, इटलीचे आगामी G7 अध्यक्षपदभारत-EU संबंध,भूमध्य आणि इंडोपॅसिफिक,युक्रेनमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील परिस्थिती यावर चर्चा केली. महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर आमच्या विचारांचे वाढते अभिसरण प्रतिबिंबित करणाऱ्याISA, CDRI, IPOI, ग्लोबल बायो-फ्युल्स अलायन्स आणि इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरीडॉर(IMEEC) सारख्या भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक उपक्रमांमध्ये सामील झाल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी इटलीचे कौतुक केले. दोन्ही बाजूंनी भारत EU मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण होण्याची आशा व्यक्त केली. एफएम ताजानी यांनी "चांद्रयान- 3" च्या यशस्वी चंद्र लँडिंगबद्दल भारताचे अभिनंदन केले आणि इस्रो आणि इटालियन अंतराळ संस्था,ASI यांच्यातील सखोल सहकार्यासाठी स्वारस्य दाखवले
मराठीतील ज्येष्ठकवी भा. रा . तांबे यांच्या ,मावळत्या दिनकरा या कवितेतील असतील शिते जमतील भुते या ओळीचा संदर्भ वरील गोष्टीना लावल्यास भारत नव्या जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झाला आहे हि गोष्ट सहजतेने समजते
टिप्पण्या