डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा
तिर्थस्वरुप
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार
डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20 आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 8 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला .पण उपयोग शुन्य झाला. त्या बद्दल आम्हाला माफ करा ?काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्यारापर्यत सरकार पोहचलेय असी बातमी वाचली . तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर तुमच्या हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्धपुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्यांना हेही माहिती असेल की , प्राथमिक न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालय दाद मागता येते . उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते . सर्वोच न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रपतींकडे दया याचिका करता येते . आपल्या भारताच्या न्यायप्रणालीमध्ये याला किती वेळ लागेल याची काहीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही . त्यामुळे आपल्या खुन्याला शिक्षा कधी मिळणार ? हा मोठा प्रश्नच आहे .
आपल्या
भारतीय राज्यघटनेमध्ये 51A
या कलमा नुसार नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे हे
त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे . मात्र याचा नागरिकांना विसर पडल्याने डॉक्टर तुमचा मारेकरी अजून गजाआड झालेला नाही मागच्या वर्षी एका
अमिनेत्याचा मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) मदत घेतली जाणार एका सिने
अभिनेत्याचा मृत्यूबाबत जी असल्याचे जाहीर केले होते एका अभिनेत्याचा मृत्यूबाबत जी संवेदनशीलता सरकारकडून दाखवण्यात येते, त्याचा एक शतांश संवेदनशीलता देशातील राज्यघटनेत सांगितलेल्या
मुलभुत कर्तव्यासाठी आपले जिवन वेचणाऱ्या आपल्याबाबत सरकारकडून दाखवण्यात येवू नये . या सारखे दुर्दैव नसावे
आमच्या नाशकात माञ तुमच्या नावे व्याखानमाला सुरु झालीये . इतरही शहरात सुरु झाल्या असतील तूमच्या नावे व्याखानमाला . याचा उपयोग किती होतो हे येणारा काळच ठरवेल . तुम्ही जो कायदा तयार केला तो खुप चांगलाच आहे यात शंकाच नाही त्या कायद्यातर्गत काही शिक्षाही झाल्या . तुम्ही जिथे कुठे असाल तिथे हे बघून तुम्हाला आनंदच झाला असणार . आपल्या राज्यघटनेत 51 अ या कलमातंर्गत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे नागरीकाचे मुलभुत कर्तव्य आहे माञ त्याचे पालनच केले जात नाही . परीणामी तुमच्या सारख्यांचा प्राण जातो हे दुर्दैवाचेच आहे ना ? त्या घटनेनंतर शनवार
पेठेतील ओंकारेश्वर पुलावरुन मी कित्येकदा प्रवास केला आहे दरवेळेस मला तुमची आठवण आल्या शिवाय रहात नाही .अनेक पोलिसी प्रकरणांची फाईल कालांतराने कोणालाही काहीही शिक्षा न होता बंद होतात. दुर्देवाने आपल्या हत्येबाबबत हेच घडताना दिसत आहे . तुम्ही मांडत असणारी भुमिका जरी योग्य असली तरी जनमताचा काहीसी विरोधी असल्याने याबाबत जनमताचा रेटा उभा रहाणे अशक्य आहे . मात्र त्यामुळे आम्ही आपल्या सारख्या एका महान विचारवंताला, समाजाला पुढे नेणाऱ्या समाजसुधारकाला न्याय देण्यात कमी पडलोय हे मात्र नक्की .ब्रिटीश भारतात येण्यापुर्वी जागतीक व्यापारात असणारा भारताचा 23टक्के असणारा वाटा ब्रिटीश आल्यावर कमी झाला. याला मी ब्रिटीश येण्यापेक्षा आपले विज्ञानाकडील दुर्लक्ष मानतो ब्रिटीश वैज्ञानिकदृष्टया प्रगत असल्याने हे झाले असे मला वाटते . तरी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने शहाणे का होत नाहीये ? त्यासाठी तुमच्या सारख्या अजून किती जणांना प्राणांना मुकावे लागणार ? डॉक्टर जाता जाता येव्हढच सांगतो मी अजिंक्य तरटे तरी काही झाले तरी तुमच्या विवेकाच्या मार्गावरून दुर जाणार नाही
टिप्पण्या