पोस्ट्स

एप्रिल ११, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत म्यानमार मैत्रीचा सेतू आणि बॉलिवूड

इमेज
माझ्या जपान आणि बॉलिवूड यांच्यातील सहसंबंध दाखवणाऱ्या गाण्याविषयीच्या लेखानंतर अनेकांनी मला या सारखी अजून काही या सारखी गाणी असतील तर त्याविषयी तू लिहिलेले मला वाचायला आवडेल असे सांगितल्याने त्या विषयी सांगण्यासाठी प्रस्तुत लेखन .       मित्रांनो या प्रकारचे अजून एक गाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीला चित्रीत करण्यात आले.1949 साली प्रदर्शित झालेल्या पतंगा या चित्रपटातील 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' हे राजिंदर कृष्ण लिखित आणि सी रामचंद्र यांच्या संगिताने सजलेले हेच ते गाणे.शमशाद बेगम आणि सी रामचंद्र यांनी गायलेल्या या गाण्यातून नवरा बायको यांच्यातील अतूट प्रेम दाखवले गेले आहे.          सव्वा चार मिनीटांच्या कृष्णधवल गाण्यातूनच नव्हे तर पतंगा या चित्रपटातून त्यावेळच्या भारताच्या मित्र राष्ट्रांबाबत खुप माहिती मिळते‌.भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तर म्यानमारला 4 जानेवारी 1948 ला स्वातंत्र्य मिळाले .दोन्ही देशातील राजकर्त्यांना ब्रिटीश राजवटीत लयास गेलेल्या आपल्या देशाला विकसीत करण्याचे आव्हान होते. स्वातंत्र्य म...

पक्षीय राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'

इमेज
एका ठिकाणी 3 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकारणाला सुरवात होते. असे सुप्रसिद्ध राजशास्त्रातले  समीकरण आहे.मनुष्याचा उपजत असलेल्या स्वहित बघण्याचा स्वाभाव वैशिष्ट्यामुळे राजकरणाची निर्मिती होते.मनुष्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मनुष्याची कधीच पाठ न सोडणारी गोष्ट म्हणजे राजकारण असेही म्हटले जाते‌.तर असे हे राजकारण व्यक्तीगत स्वरुपाचे देखील असू शकते.किंवा समान एका ध्येयासाठी वेगवेगळी माणसे एकत्र आल्याने वेगवेगळ्या लोकांचा एक समुह या न्यात्याने विविध पक्षांचे देखील असू शकते‌.     आपल्या भारतासारख्या खंडप्राय लोकशाहीप्रधान, आणि विविध प्रकारची विविधता असलेल्या देशात व्यक्तीगत राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण अधिक यशस्वी होवू शकते ,हे नेत्यांचा लक्षात आल्याने आज  भारतात अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत.नेते त्यांचा त्यांचा पक्षाच्या मार्फत राजकारण खेळत आपले इसिप्त साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. या पक्षीय राजकारणाचा देशाच्या प्रगतीवर मोठा परीणाम होत असल्याने त्याची काही प्रमाणात माहिती देशातील जागरुक जागृत नागरिक म्हणून आपणास असणे अत्यावश्यक ठरते.आणि या कामी मदतील...

इथेही 56

इमेज
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....