पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व
यावर्षी अर्थात 2022 साली पंडीत नेहरु यांचे निधन होवून 58 वर्षे पुर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत नसला तरी मानवी आयुष्यात अर्ध शतकाचे विशेष अन्ययसाधारण महत्व आहे . मानव पन्नासीत आला की मागे वळून पाहतोच . त्या अनुषंगाने भारताकडे बघीतल्यास आपणास पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले दिसते . त्यावेळी राजकारणात असणारे कोणीच जिवंत नाही .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे .आणि कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी शिवाय उत्तम दिन तो कोणता असणार ? येत्या गुरुवारी त्यांची57 वी पुण्यतिथी असल्याने त्यांच्या कार्याचे मी माझ्या अल्पमतीनुसार केलेले मूल्यमापन आपणासमोर मांडत आहे
मित्रानो नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्ट्री दुर्लक्षून चालणार नाही
1)नियोजन आयोग ते नीती आयोग
2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण
3)नामची स्थापना चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर
4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश
5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश
6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश
आता त्या गोष्टी सविस्तर बघू
1)नियोजन आयोग ते नीती आयोग = पंडित नेहरुंवर साम्यवादी धोरणांचा प्रचंड प्रभाव होता . साम्यवादी रशियात ज्या प्रमाणे सप्तवार्षिक योजना राबवून विकास केला जातो त्या प्रकारे भारताचा विकास करण्यासाठी त्यांनी नियोजन आयोग हा Extra constitution असणारा आयोग आणि पंचवार्षिक योजना निर्माण केल्या .सुरवातीच्या काही योजना यशस्वी ठरल्यानंतर नंतरच्या पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्या सध्याच्या नमो सरकारने त्या बंद करुन नीती आयोगाची स्थापना केली आहे .मोदी सरकारच्या नीती अयोगाचे कार्य आपणास माहिती आहेच ,
2)औद्योगिक धोरण 1948/1956ते नमो धोरण = भारत स्वतंञ झाला त्यावेळेस भारतात औद्योगिकीकरण फारसे
नव्हते भारतात औद्योगिकीकरण सुरू करण्यात 1948 आणि 1956 च्या औद्योगिक धोरणांणचा मोठा वाटा आहे या धोरणांन्वये आपण टप्या टप्याने सामाजवादी धोरण स्विकारले ज्याचा परिणाम स्वरुप आपण सुरवातीला प्रचंड प्रगती केली नंतर या पध्दतीत अनेक दोष शिरले परीणाम स्वरुप भारत कंगाल झाला आणि आपण जूलै 1991ला सध्या प्रचलीत असणारे धोरण स्विकारले
3)नामची स्थापना चीन युध्द BRIC ची स्थापना आर्थिक पॉवर = भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात पंडीत नेहरुंचा मोलाचा वाटा होता त्यांनी केलेली नामची स्थापना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील नेतृवाची चुणुक होती जे सध्या जी 77 जी 4 आदी व्यासपीठांवरुन पुढे नेत आहोत .असे असले तरी चीन बाबत झालेली नेहरुंची चुक नाकारुन चालणार नाही .माञ त्याच चीनबरोबर आपण BRICS सारख्या संघटनांच्या माध्यमातून आर्थिक ताकद बनत आहोत .
5)सायकलवरून राँकेटचे साहित्य वाहून नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश = विज्ञानाची कास ओळखुन नेहरुंनी ईस्सो आणि भारतीय अणूविज्ञान विभागाची स्थापना केली ज्याचे फळ आपण बघतो आहोच त्यामुळे आपल्या शेजाऱ्यासारखे अणू तंञज्ञान आपणास चोरुन आणावे लागले नाही किंवा विकावे लागले नाही
6)मिळणारे सदस्यत्व नाकारणारा देश आणि आता त्या सदसयात्वाकरीता भांडणारा देश = युनाटेड नेशन्सच्या स्थापनेच्या वेळी आपणास त्याचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळत होते आपण ते नाकारुन युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेचा विरोध असताना देखील चीनला देण्यास भाग पाडले पंडित नेहरू यांच्यावर हा आरोप करण्यात येतो तो भारताचे सुरवातीचे परराष्ट्र धोरणांची माहिती नसल्याने . भारताचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे परराष्ट्र धोरणएकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधण्याचे, सत्तासंघर्ष टाळत प्रादेशिक विकास साधण्याचे , पंचशील तत्वाचे होते नेहरूंनी चीनबाबाबत स्वीकारलेलाअ दृष्टिकोन चुकीचा होता असे आता आपण म्हणतोय कारण चीनचा आपणास वाईट अनुभव आला म्हणून . मात्र काहीही अनुभव नसताना एखादयला वाईट ठरवून वागणे योग्य आहे का ? तसेही एखाद्या धोरणाची भविष्यात चिकित्सा करताना त्यावेळची स्थिती काय होती , याचा विचार करावयास नको का ? तत्कालिक स्थिती ना बघता सध्याचे निष्कर्ष लावून एखाद्या गोष्टीचे आकलन करणे कितपत योग्य ? याचा पण विचार करावयास नको का ?
टिप्पण्या