वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला


 समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते ,असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 120  वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली स्वामी विवेकानंद यांचे  भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे.   मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते. त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता. भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे. जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे, आवश्यक आहे असा अनेकांचा समज होता. त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला. पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
     स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला असला, तरी ते जसेच्या तसे त्या वेळेस आचरणात होते तसे स्विकारले नाही . केरळ राज्यात सुरु असणाऱ्या धर्मामाचरणावर त्यांनी कडक शद्बात आसुडसुद्धा ओढले. त्या वेळच्या केरळ राज्यातील धर्माचरणाची  त्यांनी मनोरूग्णालय असी निर्भत्सना केली.  हिंदू धर्मातील स्पुर्श अस्पुर्श ही संकल्पना चूकीची असल्याचे त्यांनी आपल्या जीवनात बालपणी आणि पुढील आयुष्यात देखील दाखवून दिले. याबाबतची त्यांची वडीलांना भेटायला येणाऱ्या लोकांना ओढायला ठेवलेल्या हुक्याची तसेच रेल्वे स्टेशनवर घडलेल्या प्रसंगाची गोष्ट प्रसिद्ध आहेच.
स्वामी विवेकानंदाना भारतीयांनी पाश्चात्य तत्वज्ञानाऐवजी पाश्चात्यांची एकत्रीत समुहात काम करण्याची प्रवृत्ती अंगिकारावी, असे वाटत होते.  रामकृष्ण मठाच्या नागपूर शाखेमार्फत मराठीत प्रसिद्ध केलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पत्रामध्ये आपणास याचा वारंवार प्रत्यय येतो.( ही पत्रे स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा परीजार्वक अवस्थेत तसेच अमेरीकेत कार्य करताना आपल्या सहकार्यांना लिहलेली आहेत.) स्वामी विवेकानंद यांनी पाश्चत्यांनाच नव्हे, तर भारतीयांना देखील भारतीय तत्वज्ञानाची ओळख करुन दिली, ही गोष्टी यामुळे स्पष्ट होत आहे.
स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला. संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष
मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन, इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून, संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली. मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे. अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या कार्यामुळे  युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात. मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे.( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर रविवारचा उपक्रम बंद करण्यात आला आहे) तेथील स्वामीजी सहजसोप्या भाषेत युवकांना ताण तणाव सहन करण्याचा क्षमता विकसीत करणे , भावनिक अशांतता कसी हातळायची? यावर मार्गदर्शन करत.
भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण  मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले.  त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जागृत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले . पड्डूचेरीला ( जूने नाव पॉडेचरी ) ज्यांचा आध्यात्मिक आश्रम आहे,  त्या योगी अरविंदो यांना क्रांतीकारकापासून अध्यात्मककडे वळवण्याकडे स्वामी विवेकानंद यांची मोठी प्रेरणा होती . योगी अरविंदो यांना तुरुंगात स्वामी विवेकानंद यांनी दृष्टांत  दिला होता,  असे म्हणतात.  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलेली क्रांती सुविख्यात आहेच.  ते आत्महत्या करायला रेल्वे स्टेशन वर गेले होते . रेल्वे येण्यास कालावधी असल्याने त्यांनी वेळ घालवण्यासाठी स्वामी विवेकानंदाचा विचारांचे पुस्तक घेतले,  पुढे घडलेला इतीहास सर्वश्रुत आहेच.
उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीस धार्मिक ज्ञान देण्याऐवजी प्रथमतः  त्याचे पोट भरण्याची गरज असल्याची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली. उपाशीपोटी धर्मोपदेश करुन उपयोग नाही. सबंधिताचे लक्ष धर्मोपदेशनाऐवजी आपले रिकामे पोट कसे भरणार ?याकडेच असणार .रिकामे पोट भरण्यासाठी धर्मोपदेशाप्रमाणे वागता त्याचा विपरीत आचरण देखील त्यांचाकडून घडू शकते याची जाणीव त्यांना होती.  संन्याशी यासाठी खुप मदत करु शकतात, हे लक्षात घेवून आपले अध्यात्मिक  गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या नावे त्यांनी संघटन उभारले. रामकृष्ण मठातर्फे अनेक ग्रामीण भागात आरोग्याचा शिक्षणाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.. फक्त भारतातच नव्हे तर बांगलादेश.या इस्लाम धर्म प्रमुख धर्म असणाऱ्या देशात ढाका आणि चितगाव येथे रामकृष्ण मठाच्या शाखा आहेत.तर रामकृष्ण मिशनद्वारा प्रामुख्याने पाश्चात्य देश अमेरीका येथे भारतीय तत्वज्ञानविषयक कार्य केले
जाते.पुणे येथील दांडेकर पुल परीसरात असणाऱ्या  रामकृष्ण मठाद्वारे पुण्यातील गोरगरीबांच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. ते शाळेत टिकावेत यासाठी त्यांना स्वखर्चाने मोफत शिजवलेले अन्न देण्यात येते. मी दिलेले हे उदाहरण प्रातनिधीक आहे, रामकृष्ण मठाच्या अन्य शाखेद्वारे सुद्धा असेच उपक्रम राबवले जातात. मात्र मी पुण्यातील कार्य अत्यंत जवळून बघीतले असल्याने त्याचा उल्लेख केला आहे. एक दोनदा त्यांना भुगोल विषयाविषयी मदत देखील केल्याचे मला आठवते आहे.
हे सर्व कार्य केले जाते ते  रामकृष्ण मठातील संन्याश्यांमुळे .या संन्याश्यामुळे भगव्या रंगाला एक वेगळाच व्यापक अर्थ मिळाला आहे हे नाकारता येत नाही. कुटुंबापाचे पाश तोडत मोक्षाच्या वाटेवर असणाऱ्या वर्गास त्यांनी इश्वरसाधना करत समाजोपयोगी कार्यात गुंवलेले. त्यामुळे संन्यासधर्माला एक चांगला  अर्थ निर्माण झाला. काही वेळेस हेटाळणी होणारा हा वर्ग अभिनंदनास पात्र ठरला.आजमितीस स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून  हजारो संन्यासी आध्यात्मिक उन्नतीबरोबरच समाजोपयोगी कार्यात आपले योगदान देत आहे. संन्याशी यासाठी खुप मदत करु शकतात, हे लक्षात घेवून आपले अध्यात्मिक  गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या नावे त्यांनी संघटन उभारले   पुणे येथील दांडेकर पुल परीसरात असणाऱ्या  रामकृष्ण मठाद्वारे पुण्यातील गोरगरीबांच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. ते शाळेत टिकावेत यासाठी त्यांना स्वखर्चाने मोफत शिजवलेले अन्न देण्यात येते.        
 स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना एकत्रीत राहुन बलोपसाना करण्याची शिकवण दिली. तरुणांना यामुळेच गीता अधिक उत्तम कळेल असे त्यांचे मत होते. गीता वाचण्याऐवजी फुटबाँल खेळण्याचा त्यांनी तरुणांना दिलेला सल्ला याचेच प्रत्यंतर आहे. फुटबाँल हा सांघिक खेळ आहे, तसेच तो खेळण्यासाठी चांगले शरीर लागते.गीता ही कर्माची शिकवण देते, त्यामुळे तरुणांनी गीता वाचण्यापेक्षा फुटबाँल खेळण्याचा सल्ला दिला.यातून त्यांचे नेर्तुत्व कसे होते हे आपणास समजते, असे मला वाटते.
    स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर श्रद्धा ठेवत विवेकानंद केंद्रासारख्या अनेक संस्था आज  खेडोपाडी मोठे समाज कार्य करत आहेत. मग खेडोपाड्यातील तसेच आदिवासी समाजातील व्यक्तीना वाहन दूरुस्तीचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे , तसेच त्यांना आरोग्याचा सेवा पुरवणे  हे असो . या सर्व कार्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्माणाचे तत्व आपणास पदोपदी दिसते. स्वामी विवेकानंद यांचे कार्य प्रचंड आहे. मात्र लेखन कुठेना कुठे थांबवणे आवश्यक आहे म्हणून इथेच थांबतो

हि माझी एक हजार नववी  ब्लॉगपोस्ट आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?