सिंहावलोकन २०२५ : नैसर्गिक अपत्ती
आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ, पूर बेमोसमी पाऊस , या सारख्या घडामोडींचा समावेश करू शकतो .भारताला सरत्या २०२४ वर्षात दोन्ही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला
२०२५ हे वर्ष भारतासाठी नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले. हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत असताना पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा आणि भूकंपसदृश घटनांची वारंवारता वाढताना
दिसली. भारत आपत्ती जोखमीच्या बाबतीत संवेदनशील देशांपैकी एक असून देशातील सुमारे ५८ टक्के भूभाग भूकंपप्रवण, ७५ टक्के क्षेत्र अतिवृष्टी व पूरप्रवण, तर सुमारे १२ टक्के क्षेत्र दुष्काळप्रवण असल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद आहे.२०२५ मध्ये मान्सूनच्या असमान वितरणामुळे काही राज्यांत तीव्र पूरस्थिती निर्माण झाली, तर काही भागांत पावसाची कमतरता जाणवली. आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुरामुळे हजारो हेक्टर शेती बाधित झाली. प्राथमिक अंदाजानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे आर्थिक नुकसान GDP च्या सुमारे २ टक्क्यांच्या आसपास राहिल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.
चक्रीवादळांच्या बाबतीत भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर धोका कायम राहिला. २०२५ मध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे वाऱ्याचा वेग ताशी १२०–१५० किमीपर्यंत नोंदवला गेला. मात्र, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या पूर्वसूचना प्रणालीमुळे जीवितहानी तुलनेने कमी ठेवण्यात यश आले.
उष्णतेच्या लाटांचा प्रभावही वाढला. उत्तर आणि मध्य भारतात तापमान अनेक ठिकाणी ४८ अंश सेल्सियसच्या आसपास पोहोचले, ज्याचा थेट परिणाम आरोग्य, पाणीपुरवठा आणि वीज मागणीवर झाला. यासोबतच भूस्खलन, वन्यआगी आणि किनारी क्षरण यासारख्या घटनाही वाढल्या.
एकदरीत सरते २०२५ वर्ष नैसर्गिक आपत्तीचा विचार करता प्रचंड उलथापथीचे ठरले,हेच म्हणावे लागेल

टिप्पण्या