एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ? तर आपण त्या व्यक्तीशी जो काळ घालवला असतो आणी आपण त्या व्यक्तीशी जे बोललो असतो त्यावरून काढलेला तो निष्कर्ष असतो हा निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव विश्व वापरतो माञ एखाद्या विषयीची एखादी गोष्ट जर आपणास माहिती नसेल तर आपण काढलेला निष्कर्ष चूकणार नाही कशावरून ? किंवा आपले अनुभव विश्व एखाद्याची समस्या ओळखण्यास कमी पडले तरी एखाद्याच्या बाबतचे आपले मत चुकणारच ना ? मग एखाद्या निपराध माणसाला अपराधी व एखाद्या अपराधी माणसाला निपराधी ठरवून टाकतो जे योग्य नाही असे मला वाटते एखाद्याची पूर्वग्रहदुषित माहीती मिळते त्याविषयी ची माहितीची शहनिशा न
करताच एखाद्यावर फूली मानतो जे सर्वा थाने अयोग्य असते एखाद्याचा हेतू साध्य करण्यासाठी जल एखाद्याने जाणून बाजून गैर माहीती पसरवली आणी आपण त्यावरच विसंबून राहिलो तर ? आपण कदाचित एखादा चांगला मिञ कदाचित गमावून बसू . आपले चरीञ आपण कोणाबरोबर राहतो यावर विकसीत होत असते म्हणजेच एका गोष्टीमुळे आपले चरीञ बदलू शकते त्यामुळे आपणास एखादा माणूस आवडत नसला तरी त्याचाशी बोलले पाहीजे कदाचित त्याचा एखाद्या अडचणीमुळे त्याने आपणास न आवडणारे पाउल उचलले असेल जय आपणास ते कारण कळाले तर आपले त्याचा विषयीचे मत बदलू शकते असो या विषयावर खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
नाशिकमधील काही धाडसी आणि समाजभान जपणाऱ्या महिला पत्रकारांनी समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘शौर्य रणरागिणी न्यूज’ या स्थानिक वृत्तवाहिनीने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या या माध्यम संस्थेचा प्रथम वर्धापन दिन नुकताच नाशिकमध्ये अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ‘शौर्य पद्मराज रत्न पुरस्कार’ आणि पत्रकार सन्मान सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. सातपूर येथील मोतीवाला कॉलेजच्या भव्य ऑडिटोरियममध्ये आयोजित या सोहळ्याला राज्यभरातून विविध क्षेत्रांतील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, पश्चिम नाशिकच्या आमदार सीमाताई महेश हिरे, नगरसेविका मयुरीताई अंकुश पवार, ‘मिसेस इंडिया २०२४’ स्मिता अहिरे सामाजिक कार्यकर्ते संदीप शर्मा, कलाकार मयुरी सोनी तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक विश्वासराव आरोटे उपस्थ...
विदर्भातील अपरिचित अष्टविनायक
सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात चला तर जाणून घेउया त्यांच्याविषयी . वरदविनायक - टेकडी गणपती विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती . ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरच í चत प्रतिमा पाहायला मिळते . नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव . प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत . ऐतिहासिक भोसले - इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे . स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषा...
पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव
निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत ना...
टिप्पण्या