एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ? तर आपण त्या व्यक्तीशी जो काळ घालवला असतो आणी आपण त्या व्यक्तीशी जे बोललो असतो त्यावरून काढलेला तो निष्कर्ष असतो हा निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव विश्व वापरतो माञ एखाद्या विषयीची एखादी गोष्ट जर आपणास माहिती नसेल तर आपण काढलेला निष्कर्ष चूकणार नाही कशावरून ? किंवा आपले अनुभव विश्व एखाद्याची समस्या ओळखण्यास कमी पडले तरी एखाद्याच्या बाबतचे आपले मत चुकणारच ना ? मग एखाद्या निपराध माणसाला अपराधी व एखाद्या अपराधी माणसाला निपराधी ठरवून टाकतो जे योग्य नाही असे मला वाटते एखाद्याची पूर्वग्रहदुषित माहीती मिळते त्याविषयी ची माहितीची शहनिशा न
करताच एखाद्यावर फूली मानतो जे सर्वा थाने अयोग्य असते एखाद्याचा हेतू साध्य करण्यासाठी जल एखाद्याने जाणून बाजून गैर माहीती पसरवली आणी आपण त्यावरच विसंबून राहिलो तर ? आपण कदाचित एखादा चांगला मिञ कदाचित गमावून बसू . आपले चरीञ आपण कोणाबरोबर राहतो यावर विकसीत होत असते म्हणजेच एका गोष्टीमुळे आपले चरीञ बदलू शकते त्यामुळे आपणास एखादा माणूस आवडत नसला तरी त्याचाशी बोलले पाहीजे कदाचित त्याचा एखाद्या अडचणीमुळे त्याने आपणास न आवडणारे पाउल उचलले असेल जय आपणास ते कारण कळाले तर आपले त्याचा विषयीचे मत बदलू शकते असो या विषयावर खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
चोराच्या उलट्या बोंबा !
सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत कोरोना संसर्गामुळे आणि लसीकरणामुळे वातावरण तप्त असताना, जगाचा विचार करता इस्राइल आणि पँलेस्टाइन यातील संघर्षाने जगाची झोप उडवली आहे. या संघर्षाचे तात्कालीन कारण आपणास आतापर्यत माहिती झालेच असेल. माझा या लेखाद्वारे याचा इतिहास आपणापर्यत पोहोचवण्याचा उद्देश आहे. तर 19 व्या शतकाच्या उतरार्धात युरोपात राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. या राष्ट्रवादाच्या प्रबळ विचारधारेत तो पर्यत स्वतंत्र्य असलेली जर्मन भाषिक राज्ये एकत्र येवून जर्मन हा देश तयार होणे फ्रेंच भाषिक प्रदेश एकत्र फ्रान्स हा देश उदयास येण्यासारख्या घटना घडल्या. त्याच मालिकेत ज्यू धर्मियांची मूळ भूमी ज्यातून त्यांना काही हजारो वर्षापूर्वी निर्वासीत केले होते, त्या पँलेस्टाइनच्या भूमीत ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य इस्राइलची स्वप्ने काही ज्यू धर्मियांना पडू लागली. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. याला मोठ्या प्रमाणात धूमारे फुटले ते पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस 1917 साली स्वतःच्या ताब्यात असणाऱ्या या प्रदेशात युनाटेड किंग्डम या देशाने या ठिकाणी लवकरात लवकर ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य राष्ट्र उभारण्याचे
50 वर्षाचा सुवर्णकाळ
1972 आँक्टोबर 2 ही फक्त एक तारीख नाहीये. महाराष्ट्राचा एका नव्या युगात प्रवेश झाल्याची ती तारीख आहे. याच दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्राचा जन्म झाला.आज 2021 साली या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50वे वर्ष सुरु होईल. थोडक्यात मुंबईच्या वरळी या उपनगरात असणारे दुरदर्शन केद्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. त्यानिमित्ताने सर्व दुरदर्शन प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा. या 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनासाठी एक प्रयोग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वाहिनीने पुढे अनेक वर्ष टिव्हीवर मराठी भाषेतील एकमेव वाहिनी म्हणून अधिराज्य गाजवले.1994साली या केंद्राने सह्याद्री हे नाव धारण केले. त्यानंतर ही वाहिनी सह्याद्री या नावाने ओळखायला लागली.आजमितीस मराठीत अनेक 24 तास चालणाऱ्या वाहिन्या आहेत. मात्र त्या कोणाचीही सर दुरदर्शन सह्याद्रीस येणार नाही. आता आतापर्यत अनेकांच्या दिवसाची अखेर सातच्या बातम्यांनी होत असे ( माझी अजून देखील होते) बातमी कितीही महत्तवाची असली, इतर वाहिन्यांपेक्षा आधी दाखवत असलो तरी काहीही आवेश न दाखवता शांतपणे बातमी दर्शकापर्यत पोहचवया
ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?
दोनच दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन काही जणांचा बळी गेला काही जण अजूनही बेपत्ता आहेत . त्यामुळे देशाच्या अनेक भागात मोठी चर्चा सुरु आहे ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ? तर ही ढगफुटी म्हणजे काय ? ती का निर्माण होते ? तिचे परिणाम काय हे सांगण्यासाठी आजच्या लेखाचे प्रयोजन . तर अत्यंत कमी वेळात म्हणजे तीन ते चार तासात पंधरा दिवसात किंवा महिनाभरात पडतो तितका पाऊस सुमारे २५ ते ३० किलोमीटरच्या त्रिजेच्या प्रदेशात पडणे म्हणजे ढगफुटी होय हा प्रकार सामान्यतःडोंगराळ प्रदेश्यात घडतो . जसा अमरनाथ यात्रेच्या प्रदेश्यात घडला आहे आपण इतिहासाच्या धांडोळा घेतल्यास गेल्या काही वर्षात ढगफुटीच्या घटना वाढलेल्या दिसतात याला जगतिक हवामानबद्दल कारणीभूत आहे आता वळूया ढगफुटी का होते ? या प्रश्नाकडे. हे समजून घेण्याआधी आपल्याला पाऊस पडतो म्हणजे काय ?हे समजून घेणे आवश्यक आहे तर आपल्या वातावरणात पाण्याची वाफ असते शास्त्रीय भाषेत तिला बाष्प म्हणतात तर हे बाष्प कोणत्या तापमानास किती सामावले जाईल हे निश्चित आहे एखाद्या वेळी त्या विशिष्ट तापमानास जितके बाष्प सामावले जाऊ शकेल त्या पेक्षा जास्त बाष्प झाले की
टिप्पण्या