सांगा कसं जगायचं ?
आपल्या मराठीत उत्तमोत्तम कवितांची मोठी परंपरा आहे.फक्त मनोरंजन करणाऱ्याच नव्हे तर जीवनाचे सार मांडणाऱ्या कविता आपल्या मराठीत आढळतात.याच सर्वोत्तकृष्ट कवितेत समाविष्ट होणारी कविता म्हणजे ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहलेली कविता 'सांगा जगायच कसं, कण्हत कण्हत की गाणे म्हणत' ही पावणेतीन मिनीटात पुर्णत: गावू शकणारी कविता.
मंगेश पाडगावकरांनी जेमतेम पावणेतीन मिनीटात जगण्याचे तत्त्वज्ञान या कवितेत मांडले आहे. ऐकणाऱ्याला पुर्णत: सकारात्मता शिकणारी कविता प्रत्येकाने मुखोग्गद करून, जेव्हा जेव्हा त्याच्यावर अडचणी येतील, तेव्हा ती म्हटल्यास आत्महत्या नक्कीच टळतील.नैराश्यावरचे रामबाण औषध म्हणून या कवितेकडे बघता येवू शकते.
हे सांगायचे कारण व्यवसायाने मुख्याध्यापक असलेल्या, ज्यांचे पती वन खात्यात उच्चपदस्थ आहेत अस्या जळगाव शहरातील एक भगिनी.ज्यांचे कर्करोगाने नुकतेच दुर्देवी निधन झाले आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मिडीयात विशेष चर्चित आलेली पोस्ट.स्वत:चा मृत्यू समोर दिसत असताना , लोकांना लिहिलेली ती पोस्ट हाच सकारात्मक दृष्टिकोन आपणास देते. जो या कवितेत सुद्धा सांगण्यात आला आहे.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा एक उत्तम चित्रपट म्हणून 'आनंद' हा चित्रपट ओळखला जातो.कर्करोगाने लढणारा स्वतःच्या मृत्यू समोर दिसत असताना ते दु:ख स्वत:च्या मनात दाबून ठेवून लोकांना दु:ख विसरायला लावणारा आनंद त्यामुळे रुग्णालयाच्या रूपाने चिरतरुण राहतो. तो आनंद जरी रील लाइफ मधील असला तरी रियल लाईफ मध्ये सुद्धा आनंद आहे. जळगावच्या त्या ताई,हाच संदेश देत आहेत.त्यामुळे त्या जरी आता आपणकडे सदेह नसल्या तरी आपल्या विचारातून अजून देखील आपणातच आहेत.विचारामुळे त्या अमर आहेत,हेच निर्विवाद सत्य आहे.
ज्या कवितेविषयी बोललो,ती कविता ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
टिप्पण्या