पोस्ट्स

जून १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फक्त अनावश्यक सवलती आवरा !

इमेज
प्रति  देवेंद्रजी फडणवीसजी   मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेशी  जय महाराष्ट्र  साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली.  मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते‌.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल ५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब.  लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता ...

शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र, 'माज्या जल्माची चित्तरकथा'

इमेज
 साधरणत:१९८० ते१९९० या कालखंडात समाजातील शोषित,पिडीत समजला जाणारा तळागाळातील समाज आपल्या लेखनाद्वारे व्यक्त होऊ लागला.पॅथरच्या माध्यमातून आपल्या समाजातील वेदनेला वाचा फोडु लागला. मात्र यात प्रामुख्याने पुरुषवर्गाचे प्रमाण अधिक होते.माता-भगिनी महिलावर्ग तूलनेत यामध्ये काहीसा मागे होता.आता ज्याला आपण समांतर साहित्य/विद्रोही साहित्य म्हणून ओळखतो त्याचा सोन्याचा या दिवसात जी आत्मचरीत्रे प्रसिद्ध झाली,ती प्रामुख्याने पुरुषांनी लिहलेलीच जास्त संख्येने दिसतात.तूरळक स्वरुपात दिसणाऱ्या या महिलांच्या साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मचरीत्र म्हणजे, , 'माज्या जल्माची चित्तरकथा' जे मी नुकतेच वाचले. शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र म्हणजे 'माज्या जल्माची चित्तरकथा' असे या आत्मचरीत्राबाबत आपण म्हणू शकतो. पहिले दलित महिला आत्मचरीत्र असी ओळख असलेले हे आत्मचरीत्र अन्य  विद्रोही साहित्यातील आत्मचरीत्राप्रमाणेच गावकुस्यात झालेला अन्याय, त्यावर मात करण्यासाठी केलेला संघर्षाचे दर्शन घडवते.या प्रकारच्या अन्य आत्मचरीत्रात असते, त्याचप्रमाणे सुरुवातीला बोली भाषा आणि पुस्तकाचा साध...

आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,

इमेज
  दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम  गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव  देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी'  हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल  ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश  सांगायचं झाल्यास,  देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो. आपण अनेक...