भ फक्त आणि फक्त भाकरीचा भावनेचा कदापि नव्हे

ध्या नागपुरी वडाभात खाणार्या काहि व्यक्तींच्या मतांमुळे मराठी जगत ढवळून निघत आहे . महाराष्ट्राच्या विभाजनासंबधी त्यांनी सांगितलेली मते काहि जणांना अप्रिय वाटत आहे . या प्रश्नाला  वाचा फोडणार्यांना अखेर त्यांना कार्यमुक्त व्हावे लागले . जे माझ्या मते अत्यंत अयोग्य आहे . माणसाला जगायला भाकरीच लागते भाव भावनांवर माणसाचे पालन पोषण माझ्या मते तरी शक्य नाहि . जर सद्यस्थितीत महाराष्ट्राचा विकास त्याचा मोठ्या  आकारामुळे होत नसेल तर त्याचे 2(विदर्भ +महाराष्ट्र ) /3(विदर्भ +मराठवाडा+
महाराष्ट्र )/4 किंवा काय पाहिजे तितके तूकडे करायला माझे समर्थन आहे . काहि लोकाच्या भावनेच्या पोटी जावून प्रदेशाचा  विकास जर थांबत असेल तर त्या भावनांना किंमत न देणेच योग्य ठरेल . मला महाराष्ट्रातील 108हूताम्यांविषयी पुरेपूर आदर आहेच . पण त्याचे भांडवल करत   एखाद्या प्रदेशाला अविकसीत म्हणून ठेवायला विरोध आहे . जर तूम्हाला महाराष्ट्र अखंडच ठेवायचा असेल तर हे प्रदेश मागे का राहिले याचा विचार करायलाच पाहिजे आणि त्यांना विकासाबाबत बरोबरीने आणणे आवश्यक आहे . जर हे शक्य नसेल तर वेगळे होण्यात गैर काही नाहि असे माझे स्पष्ट मत आहे .
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?