मानवा आता तरी जागो हो
सध्या उत्तर भारतासह उत्तर महाराष्ट्र थंडीने गोठला आहे. सहा महिन्यापूर्वी हाच भाग वाढत्या तापमानामुळे होरपळत होता. सहा महिन्यात तापमानात इतकी उलथापालथ होण्याचे कारण म्हणजे हवामान बदल.होय. सध्याचा काळात समस्त मानवजातीसमोरील प्रश्न म्हणजे हवामान बदल होय .
मात्र आपल्या देशातील राजकारणी यांच्या मते हा मुद्दा अजून त्यांचा जाहीरनाम्यात आलेला आंही . तो जेव्हा येईल तो सुदिन म्हणावा . लागेल . सन २००० पासून चे रेकॉर्ड तपासले असता आपणास लक्षात येते की प्रत्येक वर्ष मागील वर्षांपेक्षा अधिक उष्ण आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकवर्ष मागील वर्षापेक्षा अधिक थंड होते .
अमेरिकेचे माजी अध्यक्ष अल गोर यांच्या An inconvenient truth या लघुचित्रपटात अथवा day after tomorrow या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सध्या होत आहे ही फक्त सुरवात आहे
भविष्यात यापूढे असेच हवामान अनूभवयास मिळणार आहे त्यामूळे म्हणावेसे वाटते की मानवा
आता तरी जागा हो आणि अन्य मुद्यांवर भांडण्यापेक्षा मानवाने या मुद्यावर एक्त्र येऊन काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे . जर मानवजातच शिल्लक राहिली नाही तर अन्य जाती धर्मावर भांडणार ते कोणासी ? समस्त मानव जाती समोरील ते संकट आहे . त्यांचा मुकाबला आपणाला करावाच लागणार आहे .
टिप्पण्या