मंदीचे आरोग्यावरील संभाव्य परीणाम

                    सध्या भारतात सर्वत्र आर्थिक मंदीची चर्चा होत आहे . मंदीच्या आर्थिक परीणामावर सरकार योग्य ती पाउले उचलेल , यात शंका नसावी . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , तीच्या सामाजिक परीणामावर , त्यातही मंदीमुळे व्यक्तींच्या  आरोग्याबाबत किंबहुना अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परीणामाविषयी .
                    आपल्या भातात आरोग्यिविषयी त्यातही मानसिक आरोग्याबाबत प्रचंड प्रमाणात अनास्था आहे . परीणामी जगमान्य प्रमाणाच्या तूलनेत  लोकसंख्येचा विचार केला असता आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ अत्यंत कमी आहेत . त्यामुळे येणाऱ्या मंदीच्या काळात हातचे काम गेल्याने, आर्थिक ओढाताण झाल्याने   येणाऱ्या नैराश्यावर मानसिक ताणतणावांना भारतीय कसे सामोर जातात , हे बघणे आवश्यक आहे . माझ्यामते हा प्रश्न जर व्यवस्थित हाताळला न गेल्यास आगीतून फुफाट्यात अशी आपली परीस्थिती होउशकते . शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रूपाने आर्थिक प्रश्न किती विक्राळ स्वरूप धारण करू शकतो , याचा आपण सर्वांनी अनुभव घेतला आहेत . त्याहून मोठा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो . 
               एकवेळ आर्थिक मंदीच्या प्रश्नाकडे सहजतेने लढता येईल . मात्र त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक आणि त्यातही मानसिक आरोग्याचा प्रश्नाकडे बघणे सोपे नाही . हा प्रश्न व्यवस्थित न हातळला गेल्यास आत्महत्येचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो . व्यसनाधिनता वाढू शकते. ज्यामुळे नविन सामाजिक प्रश्न निर्माण होवू शकतात. माझ्या सध्याचा आकलनानुसार भारतीय आरोग्य व्यवस्था हे आव्हान पेलण्यासाठी सक्षम नाहीये . ती सक्षम व्हावी अशी आशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?