सुशांत सिह राजपुतचा अकाली जाण्याने निर्माण झालेले प्रश्न

               
             थोर अध्यात्मिक गुरु भय्यु महाराज, भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ  अधिकारी हिमांशू राँय , नावाजलेले उद्योजक व्ही जी सिद्धांत आणि अभिनेता सुशांत सिह राजपुत ,वेगवेगळ्या क्षेत्रातील ही नावाजलेली  माणसे . या सर्वांची क्षेत्रे जरी भिन्न भिन्न असली तरी या सर्व व्यक्तींमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे या सर्वांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले .
                      या सर्वांच्या आत्महत्येने पैसा हे सर्वस्व नाही, हे पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे .पैश्याबरोबर आपली म्हणता येतील ज्याचा बरोबर आपण आपले सुख दुःख शेअर (सामाईक)करु शकतो अशी माणसे बरोबर असणे अत्यावश्यक असल्याचे दाखवून दिले आहे . सुमारे सहा महिन्यापुर्वी भारतात जगात सर्वाधिक नैराश्यगस्त व्यक्ती असल्याचे एका वैद्यकिय अहवालात स्पष्ट करण्यात आले होते . मात्र नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले . ज्याची किंमत आपण 14जून 2020ला एका गुणी अभिनेत्याला गमावून चुकवली 
                         आपल्याकडे मानसिक रोगाबाबत समाजाचा दृष्टिकोन फारसा उत्तम नाही, परीणामी आपणास कोणतातरी मानसिक रोग आहे, याबबत सन्माननीय  अपवाद वगळता गुप्तता पाळली जाते .नैराश्य ही सुद्धा एक मानसिक व्याधी आहे , हेही आपण लक्षात घेणे आवश्यक आहे .त्यामुळे नैराश्याबाबत सजगतेने चर्चा होत नाही. जे होणे अत्यावश्यक आहे .सध्याचा काळ अत्यंत ताणतणावाचा आहे, विभक्त कुटुंबपद्धती , शिक्षण तसेच करीयरमधील तीव्र स्पर्धा यामुळे निर्माण होणार ताण , ज्याप्रमाणे प्रेशर कुकरमधील वाफेला योग्य वाट न मिळाल्यास वाफ कुकर फोडून बाहेर येते , त्याप्रमाणे विघातक मार्गाने बाहेर पडतो, मग तो कधी बेझूट गोळीबारचा समाजाला त्रास देणाऱ्या  मार्गाने बाहेर पडतो किंवा आत्महत्येसारखी स्वहानी करणारी कृतीच्या मार्फत बाहेर पडतो.
आपल्या भारतात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची संख्या प्रचंड आहे . काही वर्षापुर्वी आलेल्या थ्री इडीयट या चित्रपटाने आत्महत्येची दाहकता दाखवलेलीच आहे . त्यात अमीर खानने विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख किती मोठा आहे, हे सांगितले आहेच . शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यांना माहिती आहेच मात्र यावर कार्यवाही म्हणून समुपदेशन करण्याबाबत काही ठोस उपाय योजना केलेल्या दिसत नाही . 
या लेखात सुरवातीला ज्या व्यक्तींचा उल्लेख केला, त्या व्यक्तींचा आत्महत्येनंतर काही दिवस नैराश्य, तणाव यावर माध्यमांमध्ये चर्चा झाली, मात्र योग्य ती कार्यवाही काही झाली नाही .सुशांतसिंग राजपुत याचा आत्महत्येनंतर तरी सरकार यावर काही ठोस उपाययोजना करेल अशी आशा व्यक्त करुया .
.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?