सिंहावलोकन २०२४ :भारताचे आनंदाचे चिंतनाचे,शरमेचे क्षण


1990 पासुन पुढील ५ते ६ वर्षे ज्या २१ व्या शतकाचे गुणगाण केले जात होते‌. त्या २१ व्या वर्षाचे एक चतूर्थांसवे वर्ष म्हणुन ज्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्षाचा आपण उल्लेख करु शकतो त्या २०२५मध्ये आपण लवकरच प्रवेश करणार आहोत.एका अर्थाने हा सिंहावलोकनाचा काळ आहे.मागे बघून काय काय झाले याचा आढावा घेण्याचा हा कालखंड. आपल्या मानवी आयुष्याचा विचार करता कोणत्याही सिंहावलोकनासाठी  वर्ष हा कलावधी उत्तम आहे.चला तर बघुया थोड्याच दिवसात सरणाऱ्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये काय काय घडामोडी घडल्या.मी हा आढावा विषयनिहाय घेणार आहे.या लेखात मी बोलणार आहे.सरत्या वर्षातील आपल्या भारताचे आनंदाचा, चिंतनाच्या दु;खाच्या घटनांविषयी.
आपल्या भारतीयांना आनंद होण्याचा अनेक घटना या वर्षात घडल्या. वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यातच जानेवारीत घडली.हिंदूच्या अनेक पिढ्या ज्यासाठी लढल्या,प्रसंगी आपल्या प्राणाचे मोल देखील देण्यास मागे पाहिले नाही ते अयोद्धेथ प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले‌. त्यानंतर मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत नावाजलेल्या फ्रान्सचा फिल्म महोत्सव असलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये भारताच्या प्रायोगिक चित्रपटनिर्मितीच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना कलाकारांना मोठ्या प्रमाणात पारोतोषिके देवुन गौरवण्यात आले.जून महिन्यात भारताच्या गौरवाची बाब असलेल्या प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या विस्तारीत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.क्रीडा क्षेत्रात बुद्धिबळ, हॉकी, आणि क्रिकेट आणि दिव्यांग खेळाडुंनी भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला. इस्रोने मोठ्या प्रमाणात परकीय भांडवल स्व कर्तुत्वाने उभारले. अनेक राष्ट्रिय महामार्गाच्या , रेल्वेच्या अनेक रखडलेल्या प्रकल्पाचा कामाला या वर्षी गती मिळाली.ज्यामध्ये काश्मीरला रेल्वेच्या नकाश्यावर आणणारा यू.एस.बी आर .एल.हा  प्रकल्प, समृध्दी महामार्ग, अटल सेतू कोस्टल रोड,अहिल्यानगर बीड रेल्वेमार्ग या सारख्या प्रकल्पांचा समावेश होतो    
     भारतीयांना अपमान वाटेल, आपले काही चुकत तर नाही ना असे वाटावे अस्या घटना देखील दुर्देवाने या वर्षी घडले.२०२२ च्या मे महिन्यापासून धूमसणारे मणीपुर अजून देखील धुमसतच आहे.आर्म फोर्स स्पेशल फोर्स ॲक्ट अर्थात आस्फा मणीपूरच्या काही भागात लावावा लागला. रेल्वे रुळावरुन घसरण्याचा,मालगाडीने
पाठीमागून धडक देण्याचा, रेल्वेत घातपात घडवण्यासाठी समाज कंटकाकडून करण्यात येण्याचा घटना तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदू धर्मप्रेमी तसेच विरोधकांवर हल्ले करण्याचा घटनांमध्ये वाढ झाली. मुसळधार पावसामुळे बंगळूरु, चेन्नई,हैद्राबाद या शहरात परिस्थिती बिकट झाली.महाराष्ट्र एसटीचा तोटा मोठ्या प्रमाणात राहिला एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार अजून देखील अनिमतीतपणेच होत आहे. सन २०००पासून नित्यनियमाने तापमान वाढत आहे.यंदाही ही दुर्देवी परंपरा चालूच राहिली.राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप करतानाची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली.
एकंदरीत हे वर्ष भारतीयांसाठी थोडे हसू थोडे रडू असेल ठरले असे म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

31वर्षे अभिमानाची*

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक