पोस्ट्स

,कोरोना पश्च्यातील चीन उलगडणारे पुस्तक, 'चीन, रंग आणि ढंग',

इमेज
           गेल्या दोन तीन वर्षापासून मराठीत विविध विषयांवर   माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . पुर्वी या विषयांवर मराठीत अभ्यासपुर्ण पुस्तक येणे शक्यच नाही असे वाटे , त्या विषयांवर देखील माहितीपुर्ण पुस्तके येत आहेत . जे अत्यंत उत्तमतेचे लक्षण म्हणता येईल . सातत्याने वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह , भारताच्या   परराष्ट्र धोरणावर परीणाम करणाऱ्या चीन सारख्या देशांवर देखील आता मोठ्या संख्येने पुस्तके निघत आहेत . याच मराठी पुस्तकांमध्ये समावेश होवू शकेल असे एक पुस्तक , मी नूकतेच वाचले .' चीन , रंग आणि ढंग ',  या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ . अनंत पा . लाभसेटवार यांनी लिहलेल्या या पुस्तकात कोव्हिड नंतरच्या जगात चीनचे आर्थिक , राजकीय , आणि लष्करी स्थान काय असेल . याबाबत माहिती मिळते .        सुमारे पावणेतीनशे पानाचे हे पुस्तक , चीनचे नेतृत्व , राजकारण , अर्थकारण , करोनाचे हत्याकांड या चार भागात विभागले आहे . प्रत्येक भा...

रंगणार भारत आणि चीनचे युद्ध ६४ घराच्या पटावरं

इमेज
             येत्या मंगळवार २६ तारखेपासून भारत आणि चीन यामध्ये एक युद्ध रंगणार आहे मात्र घाबरायचे काहीच कारण नाही . कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाहीये .  हे युद्ध रंगेल सिंगापूर येथील  पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये . या युद्धात भारताकडून प्रतिनिनित्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या ६४ स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट २०२४ स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे,हे युद्ध खेळवण्यात येईल .               बुद्धिबळाचे पारंपरिक पद्धतीचे अर्थात बुद्धिबळपटूच्या भाषेत क्लासीकल पद्धतीचे एकूण १४ डाव या युद्धात खेळवण्यात येतील २६ तारखेपासून दररोज एक सामना खेळवण्यात येईल ..३ सामने झाल्यावर एक द...

मधाबरोबर लेमन टी चा आस्वाद घेयचा असेलं तर हक्काचे एकमेव ठिकाण....ग्रॅज्युएट चहा...!

इमेज
चहा...आपण सर्वजण दिवसातून एकदा तरी पिणारे पेयं! दिवसाची प्रसन्न सुरवात करणाऱ्या या पेयाची मानवी जीवनातील गरज ओळखुन पहिल्यांदा पुणे या शहरात आणि पुढे सर्व महाराष्ट्रभर चहा विक्रीची दुकाने उभी राहिली.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे मग या दुकानदारांनी अंमलात आणण्यासाठी त्यांनी सुरु केले.कोणी साखर आणि दुध यांचे प्रमाण जास्त करुन सणावाराला करण्यात येणाऱ्या बासुंदी या या खाद्यपदार्थात चहाची पावडर टाकून तर चहा पित नाहीना असे वाटावा असा चहा सुरू केला. तर इतर कोणी अन्य असेच फंडे वापरण्यास सुरवात केली‌. मात्र यात ग्राहक लक्षात न घेता स्वहिताला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचे  ग्राहकांच्या अट्टल चहाप्रेमींच्या लगेच लक्षात आले, आणि हे फंडे लगेच  मागे देखील पडले. मात्र कोळश्याचा खाणीतच हिरा सापडतो. त्याप्रमाणे या स्वहिताचा जास्त विचार करणाऱ्या,या गल्लाभिरु चहाच्या दुकानात एक खरा ग्राहकप्रेमी ,स्वहितापेक्षा ग्राहकांच्या हिताला अधिक महत्त्व देणारा एक चहाविक्रेता,   ग्राहकांचा हिताचा आरोग्यचा विचार करत तयार केलेल्या आपल्या वैशिष्टपुर्ण चवीचा चहा ग्राहकांना देत...

रियल चक दे इंडिया..!

इमेज
   शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.     आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेक...

महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'

इमेज
आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर  दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला.           नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे,  लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या वि...

राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारी कादंबरी 'मुबई दिनांक'

इमेज
                १६ नोव्हेंबर १९७९ ही   फक्त एक तारीख नहिये.   आपल्या मराठीतील ज्याला ऑल टाइम ग्रेट सिनेमा म्हणता येईल अश्या ' सिहासन ' या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ती तारीख आहे .   आपल्या चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपट दिगर्शक निर्माते असलेल्या जब्बार   पटेल यांची कलाकृती असलेला हा चित्रपट आज त्याला निर्माण होऊन ४५ वर्षे अर्थात २५ वर्षाची एक पिढी या हिशेबाने दोन पिढ्याच्या कालावधी होत असला असला तरी   कालसुसंगत वाटतो , कंटाळवाणा होत नाही. यातच त्याचे महत्त्व   अधोरेखित होते. चित्रपट यशस्वी होण्यामागे चित्रपटात अभिनय करणारे कलाकार जितके महत्वाचे असतात तितकीच महत्वाची असते चित्रपटाची पटकथा.   चित्रपटाची   पटकथा सशक्त होणार का . यामध्ये पटकथा लिहणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच किंबहुना कणभर जास्तच महत्त्वाची असते पटकथा. ज्या   कथा कादंबरीवर आधारित आहे त्याचे सशक्त असणे   सिंहासन हा चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारित आहे त्या देखील तितक्याच सशक्त असल्याने चित्रपट जवळपास पन्नाशीत आला तरी आपल्याला खिळवून ठ...

मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीची साविस्तर माहिती देणारे पुस्तक, 'नॅनोदय'

इमेज
            आपल्या सर्वांचेच आयुष्य गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बदलले आहेत १९९० ते २००० या दहा वर्षाच्या  आसपास जन्मलेल्या माझ्यासारख्याव्यक्तींचे  आयुष्य त्यांच्या पालकांपेक्षा पुर्णतः वेगळे ठरले  या बदलला या काळात अत्यंत झपाट्याने  झालेली  तंत्रज्ञनातील प्रगती असे ठराविक साच्याचे उत्तर देता येते असले तरी अधिक सविस्तरपणे आणि बिनचूकपाने उत्तर देयचे झाल्यास या मागे या मागे  नॅनो टेक्नॉलॉजी आणि आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होऊ घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामुळे आपले जीवन मागच्या पिढीच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे हे नाकारून चालणार नाही .तंत्रज्ञानातील प्रगतीपेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी  आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजिनयस )  या डाँग गोष्टीमुळे आपले जीवन मोठ्या प्रमाणात बदलले आहे त्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) हे क्षेत्र अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हण्टले तरी चालू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिनयस ) यामध्...