पोस्ट्स

नटसम्राट..‌.आयुष्याची दाहकता थेटपणे उलगडवून दाखवणारे नाटक

इमेज
                                     आपल्या मराठीला अनेक अजरामर साहित्याची परंपरा लाभलेली आहे.जी जिवनाच्या प्रत्येक अंकाला आपले मराठी साहित्य स्पर्श करते.साहित्याचा सर्वच प्रांतात जसे कथासंग्रह, कांदबरी,‌निबंधवजा लेखन,काव्यसंग्रह अगदी नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला हा ठसा उमटलेला दिसतो.आपल्या मराठीत अनेक धीरगंभीर विषय देखील नाटकांनी यशस्वीरीत्या समाजापुढे आणले आहेत. याच मालिकेत समाविष्ट होवू शकणारे अजरामर नाटक म्हणजे 'नटसम्राट'.माझ्याकडे हे पुस्तक २००४ पासून आहे‌.मी हे पुस्तक अनेकदा वाचलयं. १५ डिसेंबर रोजी घर आवरताना मला हे पुस्तक दिसले,असो .               तरुणपणी अत्यंत यशस्वी असलेल्या मात्र म्हातरपणात सर्वकाही मुलांकडे सोपवल्याने कफल्लक झालेल्या एका नटाची कथा या नाटकात सांगण्यात आल्याचे आपणास माहिती असेलच. माझ्यामते या नाटकाचे थोडक्यात वर्णन करायचे असल्यास गुरुदत्त या दिग्दर्शित केलेल्या प्यासा या चित्रपटातील 'जाने वो कैसै लोग थे,जिनको प्यार को प्यार मिला, जब ...

पाकिस्तानमधील राजकीय.सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेणारे पुस्तक, 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'

इमेज
                                 आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही  युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः  वेगवेगळ्या  बाबी आहेत.  त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे,  एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी  देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस  माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्याम...

असा झाला बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा प्रवास

इमेज
  चेन्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश हे चीनचा नागरिक ग्रँडमास्टर माजी विश्वविजेता डिंग वीरेन यास जागतिक बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धा २०२४ च्या १४ व्य फेरीत नाट्यमयरित्या   हरवून नवे बुद्धिबळ विश्वविजेते झाल्याचे एव्हाना आपणास समजले असेलच मात्र हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता , आणि गेल्या तीन आठवड्यापूर्वीच सुरु झालेला नव्हता .तर त्यासाठी किमान २ वर्षाची अथक तपश्चर्या होती    जागतिक बुद्धिबळ स्पर्धा लौकिक अर्थाने २५ नोव्हेंबर २०२४ ला सुरु झाली असली तरी ती जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल ही स्पर्धा मागच्या वर्षी २०२३ ला सुरु झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल २०२३ साली बुद्धिबळाची जागतिक स्तरावर नियमन करणारी संस्था फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस अर्थात फिडे या संस्थेकडून खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने ग्रँडमास्टर डी गुकेश या स्पर्धामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे ते बुद्धिबळ विश्वविजेत्याला कोण आव्हान देणार हे ठरवणारी   कॅन्डीडेट स्पर्धा खेळण्यास पात्र ठरले  कॅन्डीडेट स्पर्धा जगातील अव्वल अश्या ...

एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?

इमेज
गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या  बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन                  तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ,  अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी काही महिन्यापुर्वी अशोक लेलँड कडुन २४...

बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेची चढती कमान

इमेज
                    सिंगापुर येथील सेंटोसा आयलंड येथे बुद्धीबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा सुरु आहे. तिथे चीनचा नागरिक वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लिरेन  आणि २०२४चा कँडीडेट स्पर्धा विजेता आपल्या सर्वांचा आवडता लाडका सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यांत  अटीतटीची लढाई सुरु आहे. हे तूम्हाला एव्हाना माहिती झाले असेलच.भारताचे पहिले ग्रँडमास्टर असणारे भारतीय बुद्धिबळातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले विश्वनाथन आनंद हे या आधी ही स्पर्धा खेळले होते.त्यानंतर सुमारे १२वर्षांनी कोणता तरी भारतीय ही बुद्धिबळातील ही अत्यंत मानाची स्पर्धा खेळतोय.जे आपल्या समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.अमेरिका आणि रशियाचे बुद्धिबळावर असलेले वर्चस्व मोडीत काढत नार्वे, चीन आणि आपले भारतीय  खेळाडू यात उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे,ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे‌                   हा लेख लिहण्यापर्यत स्पर्धेतील ९ सामने झाले आहेत, ज्यामध...

इस्रोच्या मानाच्या शिरपेचात अजून एक तूरा

इमेज
     इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो दिवसोंदिवस जगाचा अधिकाधिक विश्वास संपादन करत आहे.२०२३ची जगातील सर्वोत्तम अंतराळ संशोधन संस्था म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर, तर त्यात झपाट्याने वाढच होताना दिसत आहे.  त्यामुळेच ५ डिसेंबर रोजी युरोपीय स्पेस एजन्सीच्या महत्तकांक्षी प्रोब ३चे प्रक्षेपण करण्याची  संधी इस्रोला मिळाली.जिचे सोने करत इस्रोने प्रोब३ चे यशस्वी प्रक्षेपण करत, आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि स्वत:च्या शिरपेचात मानाचा तूरा देखील रोवला. त्याबद्दल इस्रोच्या सर्व संशोधकांचे करावे तितके कौतूक कमीच आहे.इस्रोने या आधी दुसऱ्या संस्था,देश यांचे उपग्रह स्वत:च्या उपग्रह प्रक्षेपण यानातून प्रक्षेपित केलेले असले तरी आताचे आव्हान मोठे होते.प्रोब ३या मोहिमेत दोन उपग्रह हाकेच्या अंतरावर प्रक्षेपित करायचे होते.यामध्ये अत्यंत कमी काही मिलमिटरचा देखील फरक पडला असता तर मोहिम अयशस्वी ठरली असती‌,आणि कोट्यावधीचा खर्च वाया गेला असता,इस्रोच्या अभियंतांनी हे आव्हान स्विकारले आणि खरे करुन दाखवले सुद्धा.  इस्रोमार्फत अत्यंत कमी खर्चात अंतराळ म...

प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'

इमेज
सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही  नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर  कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन  म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी  लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू          तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक  आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो‌.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत...