याकडं बी ध्यान असू द्या !

गेल्या 2/3 दिवसातील महत्वाची पण मराठी माध्यमांतून काहीसी निसटलेली म्हणजे युनाटेड नेशन्स (हे माझ्यामते विशेष नाव आहे आणी विशेष नामाचे भाषांतर होत नाही त्यामुळे प्रचलीत असले तरी मराठी नाव वापरल नाही ) मध्ये सुरु असलेली परीषद ज्यामध्ये सिक्यूरिटी कौन्सिल मध्ये बदल घडवण्यासाठी चर्चा होणे अपेक्षीत आहे या बदलामध्ये भारत जपान जर्मनी आणी ब्राझील या जी 4 सदस्य राष्ट्रांना सिक्युरिटी कौन्सिल मध्ये पर्मनंट सिट विथ व्हेटो मिळण्याची शक्यता आहे . माञ या बाबत काही विशेष चर्चा आपल्या माध्यमात होताना दिसत नाहीये . असो जेव्हा याची अधिक्रुत घोषणा होइल तेव्हा होइलच . जगातील बहूसंख्य देश भारताकडे मोठ्या आशेने बघतात . जेव्हा आपण नामचे सक्रीय सदस्य होतो तेव्हा अनेक राष्ट्रे युनाटेड नेशन्समध्ये चर्चेला आलेल्या मुद्यावर भारताचा भुमिकेला सहजतेने पाठिंबा देत . भारताने नेहमीच शांतता सैन्यात महत्वाची भुमिका बजावली आहेच . तर सांगायचा मुद्दा अशा की त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा वाढेल . काश्मीर सारख्या मुद्यावर ठोस भुमिका घेणे त्यामुळे शक्य होईल .
माञ याला चीन काही प्रमाणात खोडा घालू शकतोस. भारताला हे तर पाकिस्तानला ते द्यावे अशा प्रकारे तो असेल . काही युरोपीय राष्ट्रांची पण या बाबत कढी आंबट आहे .
जी 4 बरोबर एखादा आफ्रिकेतील देश पण येईल आपल्या बरोबर . तसेच सिक्युरिटी कौन्सिल मधील अस्थायी देशांची संख्या पण या मुळे वाढेल सध्या या अस्थायी देशांमध्ये पाकिस्तान आहे .
युरोपिय सत्ता येण्यापुर्वी जागतीक व्यापारात भारताचा वाटा 20% होता असे म्हणतात . जो यूरोपीय राष्टांनी तंञज्ञाना आधारीत साधने वापरून केलेल्या व्यापारामुळे लक्षणीय रित्या कमी झाला आणी भारताचे जगातील महत्वाचे असणारे स्थान ढासळले ते परत मिळण्याचा मार्गातले हे महत्वाचे पाउल ठरो ही सदिच्छा
जाताजाता : सर्वांना नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा आणी गणपती उत्सवाचा खुप खुप शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?