हेल्मेट सक्ती च्या नावाने चांगभलं

                     सध्या नाशिक शहरामध्ये सर्वत्र हेल्मेट सक्तीची चर्चा जोरदारपणे चालू आहे . हेल्मेट सक्तीचे पुरस्कर्ते हेल्मेटअभावी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या सांगून हेल्मेट किती उपयोगी असे सांगत आहे . मात्र या सक्तीच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्ती एका मुद्द्यावर  जाणूनबुजून सांगत नाहीये .
                               ते म्हणजे हेल्मेट नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी  किती जणांना त्यांचा अपघात  झाल्यावर सुरवातीच्या २० मिनिटात ज्याला वैद्यकीय भाषेत कृशल अवर म्हणतात , त्या कालावधीत वैद्यकीय उपचार मिळाले होते.        कोणत्याही  अपघातात व्यक्तीला सुरवातीच्या कालावधीत मिळणाऱ्या उपचारांना अनन्यसाधारण महत्व आहे. जर ते योग्य प्रमाणात मिळाले तर कोणतीही व्यक्ती सहजतेने वाचू शकते , जरी त्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसले तरी . आणि या वीस मिनिटात योग्य ते उपचार न मिळाल्यास हेल्मेट घातलेली  व्यक्ती सुद्धा मृत होऊ शकते . या महत्तवाच्या  मुद्यावर कोणीही हेल्मेट सक्ती च्या बाजूने लढणारा बोलत नाहीये . निदान माझ्यातरी पाहण्यात अशी व्यक्ती आलेली नाही . मनुष्याला मेंदूला लागलेल्या मारामुळे व्यक्ती मृत्युमुखी पडतात .हेल्मेटमुळे हा आघात काही प्रमाणात शोषला जातो  असे हेल्मेटच्या  सक्तीच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींचे  म्हणणे असते मात्र ते वेळेत वैद्यकीय  उपचार मिळावे यासाठी काय करावे लागेल या बाबत काहीच भाष्य करत नाही . त्याबाबत एखादा कायदा करावा या बाबत ते काहीच उपाय योजना सुचवत नाही . .
               हेल्मेट चा वापरला माझा विरोध नाहीये . माझा विरोध आहे , त्याचा सक्तीला . शीख बांधवांना या हेल्मेटमुळे होणाऱ्या त्रासाकडे कोणी बघणार आहे की नाही . कि त्यांनी गाड्याच  चालवू नये , अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत मी हि पोस्ट लिहण्यापर्यंत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?